श्रीदेवींचं मृत्यू प्रकरण: 'बोनी कपूर आणि आमची ही चूक ठरली अभिशाप'

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूचं गूढ आता वाढत चाललं आहे. मृत्यूबाबत आता चर्चा सुरु झाल्या आहेत.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 27, 2018, 11:49 AM IST
श्रीदेवींचं मृत्यू प्रकरण: 'बोनी कपूर आणि आमची ही चूक ठरली अभिशाप' title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूचं गूढ आता वाढत चाललं आहे. मृत्यूबाबत आता चर्चा सुरु झाल्या आहेत.

राज्यसभा खासदार अमर सिंह यांनी म्हटलं की आमची आणि बोनी कपूरची एक चूक अभिशाप ठरली. अमर सिंह यांच्या मते ही घटना रोखता आली असती.

अमर सिंह यांनी म्हटलं की, घटनेच्या आधी ते श्रीदेवी यांच्यासोबत होते. ज्या विवाह सोहळ्यासाठी त्या दुबईत गेल्या होत्या त्या विवाहात त्यांनी देखील भाग घेतला.

बोनी कपूर यांचे कौटुंबिक मित्र अमर सिंह यांनी एएनआयला दिलेल्या माहिती म्हटलं की, उत्तर प्रदेशमध्ये आयोजित समिटमध्ये भाग घेण्यासाठी आम्ही आणि बोनी कपूर दुबईहून परत आलो. श्रीदेवी तेथे एकट्या होत्या. ही घटना आमच्यासाठी अभिशाप ठरली. जर आम्ही दुबईमध्ये सावध असतो तर ही घटना घडली नसती. श्रीदेवींना दुबईत एकटं सोडणं आमची चूक ठरली.

अमर सिंह यांनी पुढे म्हटलं की, ते कोणालाही दोष देत नाहीत. अमर सिंह यांनी मेडिकल रिपोर्टबाबत म्हटलं की, श्रीदेवी कधीच हार्ड ड्रिंक करत नव्हत्या.