मी पहाटे तीन वाजता मेसेज केला तरी मुख्यमंत्री रिप्लाय देतात- शाहरुख खान

मी त्यांना अनेकदा पहाटे तीन वाजता मेसेज पाठवलेत.

Updated: Dec 1, 2018, 10:49 PM IST
मी पहाटे तीन वाजता मेसेज केला तरी मुख्यमंत्री रिप्लाय देतात- शाहरुख खान title=

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही पहाटे तीन वाजता मेसेज केला तरी ते लगेचच रिप्लाय देतात, असे वक्तव्य बॉलिवूड किंग शाहरुख खान याने केले. मुंबईत शनिवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमात शाहरुख खान याने मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. त्यावेळी शाहरूख खानने हा खुलासा केला. देवेंद्र फडणवीस हे संकटकाळी माझ्या मदतीला धावून येणारे मित्र आहेत. मला जेव्हा एखादी समस्या असते तेव्हा मी पोलिसांना फोन करण्यापेक्षा त्यांना फोन करणे पसंत करतो. मी बहुतेकदा त्यांना अडचणीच्या वेळीच फोन करतो. बरेच लोक आहेत, ज्यांना मी कधीही मेसेज पाठवत नाही. माझ्याप्रमाणेच बाकीचेही जागे असतील असा तर्क लावून कुणाला त्रास देणे माझ्या मनाला पटत नाही. पण फडणवीसांच्या बाबतीत माझा अनुभव खास आहे. मी त्यांना अनेकदा पहाटे तीन वाजता मेसेज पाठवलेत. यात कधी वैयक्तिक समस्या होती तर कधी सामाजिक विषय होता. त्यांनी त्यावर तत्परतेने अवघ्या एका सेकंदात रिप्लाय दिला. हे केवळ तुमचं कामावर प्रेम असेल तरच घडू शकतं, अशा शब्दांत शाहरुख खानने मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची आपल्या कामावर खूप निष्ठा आहे. कामाच्या वेळांप्रमाणे आपल्या सगळ्यांची दिनचर्या ठरलेली असते. आपण ठरलेल्या वेळी उठतो, जेवतो, कामाला जातो किंवा झोपतो. मात्र, जेव्हा देवेंद्र फडणवीसांसारखी एखादा व्यक्ती आपल्या कामावर अधिक प्रेम करतो तेव्हा त्यांना कसलेच भान राहत नाही. कारण ते खरंच स्वत:च्या कामावर खूप प्रेम करतात, असे शाहरुख खानने सांगितले.