शो ला मिळालेल्या निगेटिव्ह प्रतिसादामुळे कपिल शर्मा नाराज?

अनेक वादानंतर आणि आठ महिन्यांच्या ब्रेकनंतर कपिल शर्मा नवीन शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला. 

Updated: Apr 3, 2018, 08:11 PM IST
शो ला मिळालेल्या निगेटिव्ह प्रतिसादामुळे कपिल शर्मा नाराज? title=

मुंबई : अनेक वादानंतर आणि आठ महिन्यांच्या ब्रेकनंतर कपिल शर्मा नवीन शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला. २५ मार्चपासून कपिलचा नवा शो फॅमेली टाईम सुरु झाला. मात्र त्या शो ला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे कपिल काहिसा नाखुश असल्याचे कळते आहे. पुन्हा एकदा नव्या ताकदीने तो प्रेक्षकांसमोर आला पण प्रेक्षकांचा प्रतिसाद फारसा सुखद नव्हता.
पण यात नेमकी चूक कोणाची हा प्रश्नच आहे. कारण हा शो प्रसारित व्हायला सुरुवात झाल्यानंतर कपिलने जवळपास ६ वेळा शूटिंग रद्द केले. रिपोर्ट्सनुसार, शो ला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद न मिळाल्याने कपिल काहीसा नाराज आहे.

हा अफवा पसरल्यात

प्रेक्षकांचे प्रेम आणि प्रतिसाद मिळवण्यात हा शो अपयशी ठरल्यास या शो मधील चंदन प्रभाकर, किंकू शारदा आणि नेहा पेंडसे या कलाकारांना शो बाहेर करण्यात येईल, अशा अफवा पसरवल्या जात आहेत.पण या शो चे भवितव्य सांगण्यासाठी ही वेळ योग्य नाही. कारण शो नुकताच सुरु झाला आहे. पुढील एपिसोड्समध्ये कपिल अजून काहीतरी नवे प्रेक्षकांसाठी आणेल, अशी आशा आहे.

या वादांनंतर पुन्हा मनोरंजनासाठी कपिल सज्ज

यापूर्वी सुनिल ग्रोवर सोबत झालेल्या वादामुळे कपिला चांगलाच चर्चेत आाला होता. त्यानंतर वाद वाढत गेले आणि एक एक करुन कलाकार शो सोडून जावू लागले. त्याचा परिणाम कपिलच्या शो वर झाला आणि शो बंद करण्याची वेळ आली. त्यानंतर तब्बेतीचे कारण देत कपिलने अनेकदा शूटिंग रद्द केले. त्यानंतर ट्रिटमेंटसाठी तो बंगळुरला रवाना झाला. त्याचदरम्यान त्याचा फिरंगी सिनेमा प्रदर्शित झाला. या सगळ्या वादानंतर तो पुन्हा एकदा नवा शो घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे.