महेश भट्ट यांनी वडिलांबद्दल केलेला दावा खोटा! भाच्याचा धक्कादायक खुलासा

सुप्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांनी एकामागून एक अनेक ब्लॉकबस्टर आणि सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण, त्यांचं वैयक्तिक आयुष्य असं होतं की त्यावर चित्रपट बनू शकतो.  

Updated: Oct 26, 2023, 01:39 PM IST
महेश भट्ट यांनी वडिलांबद्दल केलेला दावा खोटा! भाच्याचा धक्कादायक खुलासा title=

मुंबई : सुप्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांनी एकामागून एक अनेक ब्लॉकबस्टर आणि सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण, त्यांचं वैयक्तिक आयुष्य असं होतं की त्यावर चित्रपट बनू शकतो. सगळ्यांनाच त्यांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल माहिती आहे. पण, तुम्ही त्याच्या वडिलांना ओळखता का? त्यांची आई कोण होती? हे तुम्हाला माहितीये का?  त्यांना त्यांच्या आईबद्दल नेहमी वाईट का वाटायचं? तुम्हाला माहीत आहे का, त्यांच बालपण खूप कठीण परिस्थितीतून गेलं होतं आणि त्यांना अनेकदा 'अनौरस मूल' म्हणून हिणवलं जायचं.

महेश भट्ट यांनी दोन लग्न केली आहेत. पूजा भट्ट आणि राहुल भट्ट ही मुलं त्यांना पहिल्या लग्नापासून झालेली आहेत.  तर आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट दुसऱ्या लग्नातून झालेली मुलं आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, महेश भट्ट यांचे आई-वडील म्हणजेच आलियाच्या आजी-आजोबांनी लग्न केलं नव्हते. चला, आम्ही तुम्हाला संपूर्ण कथा  

कोण आहेत आलियाचे आजोबा?
महेश भट्ट यांचे वडील नानाभाई भट्ट, पोरबंदर काठियावाड गुजरातचे रहिवासी होते, ते काल्पनिक आणि पौराणिक चित्रपट तयार करायचे. 1940 च्या दशकात नानाभाईंनी 100 हून अधिक स्टंट आणि धार्मिक चित्रपटांची निर्मिती केली आणि खूप प्रसिद्धी मिळवली.

महेश-मुकेश यांचा जन्म लग्नाशिवाय झाला होता
नानाभाई भट्ट यांचा विवाह हेमलता भट्ट यांच्याशी झाला होता. त्यांचा मुलगा रॉबिन भट्ट हा लेखक आहे. नानभाई अभिनेत्री शिरीन मोहम्मद अलीच्या प्रेमात पडले आणि दोघंही लग्नाशिवाय एकत्र राहू लागले. असं म्हणतात की, प्रेमासाठी अनेकदा जात किंवा रंगाचा विचार केला जात नाही. त्यांना महेश भट्ट आणि मुकेश भट्ट अशी दोन मुलं होती. मात्र त्यानंतरही त्यांना त्यांचं नाव सापडलं नाही. जेव्हा हेमलता आणि त्यांच्या कुटुंबीयांना नानाभाई-शिरीनचं नातं मान्य नव्हतं तेव्हा त्यांनीही तिच्याशी लग्न केलं नाही. नानाभाई आणि शिरीन यांच्यामुळे महेश भट्ट यांनाही 'अनौरस मूल' म्हटलं जातं.

खुद्द महेश भट्ट यांनी अरबाज खानच्या चॅट शोमध्ये आपली व्यथा मांडली होती. त्यांनी सांगितलं की, त्यांना त्यांच्या वडिलांचे प्रेम कधीच मिळालं नाही. कौटुंबिक वादामुळे नानाभाई दोन कुटुंबांमध्ये विभागले गेले होते. महेश यांचं संगोपन त्यांची आई शिरीन यांनी केलं. आपल्या आईला सामाजिक मान्यता न मिळाल्याचं आणि 1998 मध्ये त्यांच्या आईचं निधन झाल्याचंही महेश यांना दुःख आहे. 

या मुलाखतीत त्यांनी असाही खुलासा केला की, त्यांचं लग्न झालंच नाही आणि त्यांच्या वडिलांनीही समाजासमोर ते कधीच स्वीकारलं नाही. जेव्हा त्यांच्या आईला देवाज्ञा झाली तेव्हा तिची शेवटची इच्छा हिंदू परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्याची नाही तर दफन करण्याची होती. महेश भट्ट यांचे वडील नानाभाई भट्ट त्यांच्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी तिथे पोहोचले आणि त्यांनी प्रथमच तिच्या कपाळावर सिंदूर लावलं. हे पाहून महेश भट्ट आश्चर्यचकित झाले. हे पाहून ते म्हणाले, 'मला आठवतं जेव्हा तिला देवाज्ञा झाली आणि माझे वडील तिच्या पत्नीसह तिथे आले, त्यावेळी त्यांनी तिच्या कपाळावर सिंदूर लावला आणि मी म्हणालो, 'बराच उशीर झाला.''

चित्रपट निर्माते धर्मेश दर्शन यांनी त्यांचे काका महेश भट्ट यांनी नानाभाई भट्ट हे  'अनौरस मूल' असल्याबद्दल केलेल्या वक्तव्याचं खंडन केलं आहे. एका मुलाखतीत, त्यांनी सांगितलं की, त्यांची आई महेश भट्टपेक्षा एक दशकाने मोठी होती आणि त्यांनी त्यांच्या पालकांबद्दल सार्वजनिकपणे केलेल्या कमेंटमुळे कदाचित त्याच्या पार्किन्सन्स रोगास कारणीभूत ठरलं. महेश, त्याचा भाऊ मुकेश आणि शीला ही नानाभाई भट्ट आणि शिरीन मोहम्मद अली यांचीच मुलं आहेत.

लेहरेन रेट्रोला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या काकांच्या दाव्यांबद्दल विचारलं असता, धर्मेश म्हणाला, ''हा मूर्खपणा आहे… या सगळ्यात फारच कमी तथ्य आहे. प्रत्येक सत्याचा विपर्यास होऊ शकतो. महेश काका हे माझे मामा आहेत आणि माझी आई त्यांच्यासाठी वेडी होती. 1939 मध्ये माझ्या आजी आणि आजोबांचं लग्न झालं. 1959 मध्ये हिंदू विवाह कायदा आला आणि तोपर्यंत माझ्या आईचंही लग्न झालं होतं. माझ्या आजीचे नाव शिरीन आहे हे महेश मामाने सांगितल्याशिवाय मला माहीत नव्हतं.