वयाच्या 40 व्या वर्षी प्रेम मिळणं... ब्रेकअपच्या चर्चेनंतर मलायका असं का म्हणाली?

वयाच्या 25 व्या वर्षी आयुष्य संपत नाही. 

Updated: Jan 14, 2022, 02:46 PM IST
 वयाच्या 40 व्या वर्षी प्रेम मिळणं... ब्रेकअपच्या चर्चेनंतर मलायका असं का म्हणाली? title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या चर्चेचा भाग आहे. ती अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. मात्र अर्जुनने नुकतीच एक पोस्ट शेअर करत ब्रेकअपच्या बातम्यांचे खंडन केले आहे.

मलायका सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, ती दररोज काहीतरी शेअर करत असते. आज मलायकाने वयाच्या 40 व्या वर्षी प्रेम मिळणं सामान्य असल्याचं म्हटलं आहे.  त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मलायका अरोराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, जी व्हायरल होत आहे. या पोस्टच्या माध्यमातून मलायकाने म्हटले आहे की, वयाच्या 25 व्या वर्षी आयुष्य संपत नाही. ती तिच्या पोस्टमध्ये वय हे केवळ आकडे आहेत असं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. 

मलायकाने लिहिले-" नाही, खरंच, वयाच्या 40 व्या वर्षी प्रेम मिळणे सामान्य झाले पाहिजे. वयाच्या 30 व्या वर्षी, नवीन गोष्टी शोधणे किंवा नवीन स्वप्ने पूर्ण करणे सामान्य केले पाहिजे. वयाच्या 50 व्या वर्षी, स्वत: ला शोधणे आणि हेतू शोधणे सामान्य केले पाहिजे. वयाच्या 25 व्या वर्षी आयुष्य संपत नाही.  ते संपले आहे असा विचार करणे थांबवा. "

नकत्याच अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा वेगळे झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. या बातम्यांनंतर अर्जुनने मलायकासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्याने लिहिले - अफवांना जागा नाही. सुरक्षित रहा. लोकांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करा. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी जेव्हापासून त्यांचे नाते अधिकृत केले आहे, तेव्हापासून दोघे एकत्र दिसत आहेत. दोघेही मित्रांसोबत पार्टी करतात आणि एकत्र वेळ घालवतात. ज्याचे फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. मलायका आणि अर्जुनच्या वयाबद्दल लोक अनेकदा कमेंट करतात. दोघेही अशा लोकांना चोख प्रत्युत्तर देतात.