परी आणि नेहाचं सत्य आजोबांना कळाल्यानंतर चौधरी कुटुंबात येणार वादळ?

परी आणि नेहाचं सत्य आजोबांना कळाल्यावर सिमीचं षडयंत्र होणार का यशस्वी?  

Updated: May 26, 2022, 11:30 AM IST
परी आणि नेहाचं सत्य आजोबांना कळाल्यानंतर चौधरी कुटुंबात येणार वादळ? title=

मुंबई : 'मोठे बाबा आणि मोठी आई यांच्या लग्नाचा वाढदिवस झालाचं पाहिजे...' असा हट्ट करणाऱ्या परीने अखेर आजोबा आणि विश्वजीत चौधरी यांना वाढदिवस साजरा करण्यासाठी राजी केलचं. मिथिला आणि विश्वजीत यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे चौधरी कुटुंबात सध्या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. परीच्या रुपात अनेक वर्षांनी मिथिला आणि विश्वजीत यांच्या आयुष्यात आलेला आनंद पाहून पॅलेसमधील प्रत्येक जण उत्साही आहे. 

मिथिला आणि विश्वजीत यांच्या आयुष्यातील आनंद कायम राहावा, म्हणून आजोबांना परीला दत्तक घ्यायंचं आहे. यासाठी आजोबा बंडू काकांकडे असा प्रस्ताव देखील ठेवतात. 

पण परीचं सत्य आजोबांना ठाऊक नसल्यामुळे नक्की काय होणार, याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलं आहे. मिथिला आणि विश्वजीतला लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परीच्या दत्तक प्रक्रियेबद्दल सर्वांना सांगण्याच्या विचारात आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तर दुसरीकडे यश देखील आजोबांना नेहा आणि परीबद्दल सर्व काही सांगण्याच्या विचारात आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मालिका कोणत्या वळणावर जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

आजोबांच्या विचारावर चौधरी कुटुंब  सहमत होईल का? किंवा नेहा आणि परीचं सत्य समोर आजोबांसमोर आल्यानंतर कुटुंबात वादळ येणार का?   महत्त्वाचं म्हणजे या सर्व प्रकरणानंतर सिमीचं षडयंत्र यशस्वी होणार का ? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. लवकरचं झी  मराठीवरील ' माझी तुझी रेशीम गाठ' मालिकेत मोठं वळण येणार आहे.