गर्लफ्रेंडचा लग्नासाठी नकार, अभिनेत्याने तिच्याच घरा समेारून काढली वरात

एका अटीमुळे अभिनेत्याला लग्नासाठी मिळाला नकार, अखेर गर्लफ्रेंडच्याचं घरा समेारून काढली वरात  

Updated: Jun 11, 2022, 02:00 PM IST
गर्लफ्रेंडचा लग्नासाठी नकार, अभिनेत्याने तिच्याच घरा समेारून काढली वरात  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्याचं काही कारणांमुळे गर्लफ्रेंडसोबत लग्न होवू शकलं नाही. असचं काही अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबत देखील झालं. एक काळ असा होता जेव्हा राजेश खन्ना (Rajesh khanna) आणि अभिनेत्री अंजू महेंद्रू (Anju Mahendru) यांच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगलेल्या असायच्या. पण काही कारणांमुळे दोघांचं लग्न होवू शकलं नाही. त्यामुळे राजेश खन्ना यांनी अंजू यांचा जळफळाट व्हावा म्हणून अभिनेत्रीच्या  घरा समेारून वरात काढली. 

1966  मध्ये  पहिल्यांदा राजेश खन्ना यांची भेट अंजू महेंद्र यांच्यासेाबत झाली हेाती. तेव्हा पहिल्या नजरेतच ते देाघे एकमेकांच्या प्रमात पडले असल्याचं समोर आलं. तेव्हा राजेश खन्ना बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक होते. पण अंजूॉ मात्र करियरला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत होत्या. 

राजेश खन्ना आणि अंजू एकमेकांच्या प्रेमात तर पडले, पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अंजूसोबत लग्न करून सेटल होण्याची राजेश यांची इच्छा होती. लग्नानंतर अंजू यांनी सिनेमात काम करू नये अशी देखील राजेश यांची इच्छा होती.

पण अंजू यांना राजेश खन्ना यांची अट मान्य नव्हाती. याचं एका अटीमुळे अंजू आणि राजेश खन्ना यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. त्यानंतर राजेश खन्ना यांनी डिंपलसोबत लग्न केलं. 

डिंपलसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजेश यांनी वरात अंजू यांच्या घरा समोरून काढली. एवढंच नाही तर त्यांनी अंजूच्या घरासमोर अर्धा तास डान्सही केला. 

आज राजेश खन्ना आपल्यात नसले तरी त्याचं अनेक किस्से आजही चर्चेत असतात. राजेश खन्ना यांचा कर्करोगाशी लढा देत असताना 18 जुलै 2012 रोजी मृत्यू झाला. अंजू महेंद्रू त्यांच्या शेवटच्या काळापर्यंत मित्र म्हणून त्यांच्यासोबतच होत्या.