'संजू' हिट झाल्यानंतर ऋषी कपूरने रणबीरला दिला हा सल्ला....

काय दिला सल्ला... 

'संजू' हिट झाल्यानंतर ऋषी कपूरने रणबीरला दिला हा सल्ला....  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आपला सिनेमा 'संजू'मुळे भरपूर चर्चेत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड मोडत आतापर्यंत 34.75 करोड रुपयांची कमाई केली आहे. एवढी कमाई करून 'संजू' ओपनिंग डे बॉक्स ऑफिस कलेक्शन करण्यात अव्वल ठरली आहे. हा सिनेमा पुढच्या 3 दिवसांत 100 करोडचा आकडा पार करेल. सिनेमा समीक्षक रमेश बाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजू हा सिनेमा यंदाचा सर्वात मोठी ओपनिंग करणारा सिनेमा ठरणार आहे. पहिल्याच दिवशी संजू या सिनेमाचं कलेक्शन 32 करोड रुपये झालं आहे. संजूने अगदी पहिल्याच दिवशी दबंग खानच्या रेस 3 या सिनेमाचा रेकॉर्ड तोडला आहे. 32 करोडच्या कलेक्शनसोबत संजू हा सिनेमा 2018 हा सर्वाधिक ओपनिंग फिल्म ठरला आहे. 

ऋषी कपूर यांनी काय दिला सल्ला? 

'संजू' या सिनेमाला मिळणारी प्रतिक्रिया पाहता रणबीर कपूरचे वडिल अभिनेता ऋषी कपूर यांनी रणबीरला एक खास सल्ला दिला आहे. हा सल्ला ऐकून रणबीर किती खूष होईल माहित नाही. पण रणबीर - आलियाचे फॅन्स मात्र नक्की खूष होतील. ऋषी कपूर यांनी सल्ला दिला की, तू लग्न कर. ऋषी कपूर यांनी हा सल्ला ट्विटवर दिला असून ट्विटमध्ये लिहिलं आहे की, बेस्ट फ्रेंड्स !! तुम्ही दोघं लग्न करा, कसं वाटतं? हाय टाइम !!

ऋषी कपूर यांनी ट्विटसोबत एक फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोत रणबीर कपूर आपला बेस्ट फ्रेंड आणि बॉलिवूडचा दिग्दर्शक अयान मुखर्जीसोबत दिसत आहे. रणबीरप्रमाणेच अयान देखील अजून अविवाहित आहे. दोघांच वय देखील सारखंच आहे. रणबीर आता 35 वर्षाचा आहे. तर अयान 34 वर्षाचा