पहिला पती मद्यपान करत मारायचा, दुसऱ्याचे लेकीसोबत गैरवर्तन आणि...; असं होतं Shweta Tiwari चं वैवाहिक आयुष्य

Shweta Tiwari आज लोकप्रिय अभिनेत्री असली तरी देखील तिला खासगी आयुष्यात सुख मिळालं नाही. 

Updated: Feb 24, 2023, 01:23 PM IST
पहिला पती मद्यपान करत मारायचा, दुसऱ्याचे लेकीसोबत गैरवर्तन आणि...; असं होतं Shweta Tiwari चं वैवाहिक आयुष्य title=

Shweta Tiwari's Married Life : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. श्वेता आणि तिची लेक पलकला एकत्र पाहिलं की पलक ही श्वेताची मुलगी नाही तर लहान बहीण वाटते. श्वेतानं आता पर्यंत तिच्या प्रोफेशनल लाइफमध्ये खूप यश मिळवलं, पण खासगी आयुष्यात तिला इतकं यश मिळालं नाही. श्वेता आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. श्वेता आजही अनेक मालिकांमध्ये आणि प्रोजेक्ट्समध्ये दिसते. यशाच्या शिखरावर असणाऱ्या श्वेताच्या खासगी आयुष्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. 

श्वेता तिवारीनं 1998 साली पहिलं लग्न केलं होतं. तिच्या पहिल्या पतीचे नाव राजा चौधरीसोबत असे आहे. श्वेता आणि राजा चौधरी यांना एक मुलगी असून तिचं नाव पलक आहे. लग्नाच्या काही दिवसांनंतर त्यांच्यात वाद सुरु झाले. याविषयी बोलताना श्वेता एकदा म्हणाली होती ती राजा चौधरी हा दारूच्या नशेत तिच्याशी भांडायचा. इतकंच नाही तर तो लेक पलकला मारहान देखील करायचा. त्यानंतर राजा चौधरीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. ज्या व्हिडीओमध्ये तो मद्यपान करून धिंगाणा घालताना दिसला. त्यानंतर 2007 मध्ये राजा चौधरी आणि श्वेता यांचा घटस्फोट झाला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पहिल्यांदा घटस्फोट झाल्यानंतर श्वेता तिच्या आयुष्यात तिच्या लेकीसोबत होती 2013 साली श्वेतानं अभिनव कोहलीसोबत दुसरं लग्न केलं. मात्र, तिचं हे लग्न देखील अपयशस्वी ठरलं. श्वेता आणि अभिनव यांचा मुलगा रेयांश आहे. दरम्यान, श्वेता रेयांशशी अभिनवला भेटू देत नाही असे सांगत खळबळ उडवली होती. तर अभिनववर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासोबत असेही म्हटले होते की अभिनव श्वेताची मुलगी पलकसोबत गैरवर्तन करायचा आणि तिला शिवीगाळ करायचा. 

दरम्यान, एका मुलाखतीत श्वेतानं खुलासा केला की तिचा लग्नावर विश्वास नाही. एवढंच काय तर तिनं लेक पलकला लग्न न करण्याचा सल्ला दिला आहे.  श्वेतानं टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'हे माझ्या मुलीचे आयुष्य आहे आणि तिला ते कसे जगायचे आहे हे मी ठरवत नाही. पण तिनं कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी नीट विचार करावा असं मला वाटतं. फक्त तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात, असं काही नाही. त्या रिलेशनशिपनंतर लग्न करणे आवश्यक आहे. आयुष्यात लग्न होणं खूप महत्वाचे आहे आणि लग्नाशिवाय आयुष्य कसे जाईल, असे होऊ नये.' 

हेही वाचा : 'आता त्याची गर्लफ्रेंड प्रेग्नंट...', Rakhi Sawant चा पती आदिलबाबत खळबळजनक खुलासा

पुढे श्वेता म्हणाली, 'मला सांगायचं आहे की प्रत्येक लग्न वाईट नसतं. माझे अनेक मित्र आहेत ज्यांचे वैवाहिक जीवन आनंदी आहे आणि मी त्यांच्यासाठी आनंदी आहे. पण मी असे अनेक मित्र पाहिलेत जे त्यांच्या वैवाहीक आयुष्यात कॉम्प्रोमाइज करतात. जे योग्य नाही. ते त्यांच्यां मुलांसाठी योग्य नाही.'