हे चित्र आता दिसत नाही, कारण समंथालाच... नागार्जुनकडून मुलाच्या घटस्फोटाचा मोठा उलगडा

प्रेमाचं हे नातं त्यांनी क्षणात संपवलं आणि चाहत्यांना हादरा बसला. 

Updated: Jan 28, 2022, 04:29 PM IST
हे चित्र आता दिसत नाही, कारण समंथालाच... नागार्जुनकडून मुलाच्या घटस्फोटाचा मोठा उलगडा  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : साऱ्या जगभरात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडेही मानानं पाहिलं जातं. जागतिक स्तरावर इथल्या कलाकारांनी कामगिरी केल्याचं लक्षात येत आहे. अशा या कलाजगतातील एका जोडीनं काही दिवसांपूर्वीच त्यांच्या वैवाहिक नात्याला पूर्णविराम दिला. 

प्रेमाचं हे नातं त्यांनी क्षणात संपवलं आणि चाहत्यांना हादरा बसला. ही जोडी होती अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य याची. 

नागा चैतन्यशी लग्न केल्यानंतर समंथा अभिनेते नागार्जुन यांच्या घरची सून झाली. सुरुवातीला या कुटुंबात असणारे नात्यांचे बंध पाहून अनेकांनाच हेवा वाटला. 

पण, काळ बदलत गेला, दिवस पुढे गेले आणि एकाएकी ही समीकरणं बदलली. हल्लीच एका मुलाखतीतून नागार्जुन यांनी याबाबतचा उलगडा केला. 

काय म्हणाले नागार्जुन? 
'नागा चैतन्यनं समंथाच्या निर्णयाला मान दिला. पण, त्याला माझी काळजी वाटत होती. मी काय विचार करेन, समाजात असणाऱ्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचं काय, असा विचार तो करत होता. 

ते दोघं एकमेकांच्या फार जवळ होते. ठाऊक नाही, त्यांनी एकाएकी हा निर्णय का घेतला? 

चार वर्षांमध्ये कधीच आम्ही त्या दोघांना भांडताना पाहिलं नाही. 2021 चं स्वागतही या दोघांनी एकत्र केलं. मला वाटतं याच्यानंतर त्यांच्यात दुरावा आला असावा', असं नागार्जुन म्हणाले. 

समंथाला घटस्फोट हवा होता आणि नागा चैतन्य यानं तिच्या या निर्णयाला दुजोरा दिला, अशा शब्दांत त्यांनी या नात्यात काय बिनसलं यावर काही गोष्टी सांगितल्या. 

समंथा अक्किनेनी कुटुंबात महत्त्वाची भूमिका बजावत होती, सगळ्यांशीच तिचं सुरेख नातं होतं. पण, एका घटस्फोटानं परिस्थिती आणि या गोड कुटुंबाचं संपूर्ण चित्र बदललं.