श्रीदेवीच्या निधनाची बातमी ऐकताच अर्जुनची ही प्रतिक्रिया

काय म्हणाला अर्जुन? 

श्रीदेवीच्या निधनाची बातमी ऐकताच अर्जुनची ही प्रतिक्रिया  title=

मुंबई : करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या सहाव्या सिझनमध्ये अनेक जोड्या आल्या आहेत. आताच्या या भागात अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची सावत्र बहिण जान्हवी कपूर देखील या शोमध्ये आली होती. शोमध्ये या दोघांनी आपल्या आयुष्याशी निगडीत अनेक गुपित सांगितली. एवढंच नव्हे तर या शोमध्ये जान्हवीची आई आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीबद्दल बोलणं झालं. 

करण जोहरने विचारलं की श्रीदेवीच्या निधनानंतर या चौघांच्या आयुष्यात काय बदल झाले. तेव्हा अर्जुन आणि जान्हवीने सांगितलं की, या घटनेमुळे आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो. आम्हाला हे माहित नाही की, हे कसं आणि कधी झालं पण जे झालं ते अतिशय चांगल झालं. 

जान्हवी कपूरने सांगितलं की, आईच्या निधनानंतर आम्हाला अशा व्यक्तीची गरज होती जो आम्हाला आधार देईल. तेव्हा सगळं काही विसरून अर्जुन आणि अंशुला यांनी आमची काळजी घेतली. 

अर्जुन कपूरला श्रीदेवीच्या निधनाचं जेव्हा कळलं तेव्हा मी अतिशय थक्क झालो. ही माहिती कळताच मी अंशुलाला फोन केला आणि विचारलं की आपल्याला काय करायला हवं. तेव्हा अंशुलाने मला विचारलं की, जान्हवी आणि खुशी कुठे आहेत? 

तिला कल्पना होती की, या सगळ्या परिस्थितीत त्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल. मी जे काही केलं ते एक चांगला मुलगा त्याच्या वडिलांसाठी जे करेल तेच केलं.