का वाटतेय तापसीच्या आई-बाबांना तिच्या लग्नाची चिंता? जाणून घ्या कारण

तापसी पन्नूने आजपर्यंत एकापाठोपाठ एक अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. 

Updated: Jul 8, 2021, 04:49 PM IST
का वाटतेय तापसीच्या आई-बाबांना तिच्या लग्नाची चिंता? जाणून घ्या कारण title=

मुंबई : तापसी पन्नूने आजपर्यंत एकापाठोपाठ एक अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. ती तिच्या प्रोफेशनल आयुष्यासाठी चर्चेत राहिली आहे. मात्र ती आपलं पर्सनल आयुष्य प्रत्येकापासून लपवून ठेवते. तिच्या कामाऐवजी कोणीही तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोललेलं तापसीला आवडत नाही. आता नुकतच तापसीने सांगितलं की, तिच्या पालकांना तिच्या लग्नाबद्दल खूप चिंता वाटतेय. याशिवाय आपल्या आई-वडिलांच्या संमतीशिवाय ती लग्न करणार नाही असंही तापसीने म्हटलं आहे.

एका मुलाखतीमध्ये बोलताना तापसी म्हणाली की, तिच्या आई-वडिलांना आवडणार नाही अशा कोणत्याही व्यक्तीशी ती कधीही लग्न करणार नाही. तापसी म्हणाली की, ती कोणाबरोबरही टाईमपास संबंध ठेवणार नाही, मात्र ती ज्या व्यक्तिला डेट करत आहे ती व्यक्ती तिच्या पालकांना आवडली नाही तर ती त्याच्यासोबत लग्न करणार नाही.

तापसी म्हणाली, 'मी ज्याला डेट करते त्याला मी आधीच एक गोष्ट क्लिअर करते. माझ्या आईवडिलांच्या संमतीशिवाय मी लग्न करणार नाही असं मी सर्वांना आधीच ,सांगून ठेवते. वास्तविक, मी ज्याला डेट करते त्याच्याविषयी आधीच माझ्या मनात अनेक विचार यायला सुरुवात होतात. जर माझं या मुलासोबत लग्न झालं नाही तर, या व्यक्तीवर माझा वेळ आणि माझी शक्ती खर्च करून काय उपयोग

मला टाईमपास करण्यात काहीच रस नाही. तर माझा मुद्दा असा आहे की, जर हे शक्य नसेल तर पुढे काहीही करू नका. माझे पालक देखील हेच म्हणतात. प्लिज लवकर लग्न कर, कोणाबरोबरही लग्न कर फक्त लवकर लग्न कर. त्यांना चिंता आहे की, कदाचित मी कधीच लग्न करणार नाही. या दिवसात तापसी बॅडमिंटनपटू मॅथियस बॉयला डेट करत आहे. ती बर्‍याचदा त्याच्याबरोबर वेकेशन जात असते. काही वेळापूर्वीच ती त्याच्याबरोबर मालदीवला गेली होती. जरी ती सोशल मीडियावर मॅथियसवरचे प्रेम व्यक्त करत नाही.

ज्याचवेळी, तापसीच्या घरी ईडीची छापा पडला होता, जेव्हा तिला मॅथियसकडून खूप पाठिंबा मिळाला. तापसीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, नुकतीच ती हसीन दिलरुबा या चित्रपटात दिसली. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात तापसी व्यतिरिक्त विक्रांत मस्से आणि हर्षवर्धन राणे मुख्य भूमिकेत आहेत.