बेस्ट फ्रेंड दिव्या भारतीच्या नव-यावर डोरे टाकायची अभिनेत्री तब्बू?

बॉलिवूडमधील लव्ह अफेअर्सची नेहमीच जोरदार चर्चा रंगलेली असते. कधी कुणाचं ब्रेकअप गाजतं, तर कधी कुणाचं पॅचअप. अजूनही अविवाहीत असलेली अभिनेत्री तब्बूही यापासून वेगळी राहू शकली नाही तब्बूचंही नाव अनेकांशी जोडलं गेलं.

Updated: Aug 24, 2017, 10:30 PM IST
बेस्ट फ्रेंड दिव्या भारतीच्या नव-यावर डोरे टाकायची अभिनेत्री तब्बू? title=

मुंबई : बॉलिवूडमधील लव्ह अफेअर्सची नेहमीच जोरदार चर्चा रंगलेली असते. कधी कुणाचं ब्रेकअप गाजतं, तर कधी कुणाचं पॅचअप. अजूनही अविवाहीत असलेली अभिनेत्री तब्बूही यापासून वेगळी राहू शकली नाही तब्बूचंही नाव अनेकांशी जोडलं गेलं.

मात्र, एकाशीही ती साताजन्माची गाठ बांधू शकलेली नाही. तब्बूने ‘प्रेम’ सिनेमात काम केले होते. या सिनेमात संजय कपूर हा तब्बूचा हिरो होता. या सिनेमावेळी तब्बूचा संजय कपूरवर जीव आला होता, असे सांगितले जाते. 

मात्र, संजयच्या आयुष्यात रविना टंडन आल्याने दोघांचे ब्रेकअप झाले. एकटी पडलेली तब्बू पुन्हा एकदा प्रेमात पडली. मात्र. यावेळेस तिचा जीव तिची बेस्ट फ्रेंड दिव्या भारतीच्या पतीवर जडला होता. ‘बॉलिवूड आजकल’ या यू-ट्यूब चॅनेलनुसार संजयच्या आयुष्यात रविना आल्यानंतर तब्बूने त्याच्यापासून दूर जाणे योग्य समजले. 

काही दिवसांतच ती साजिद नाडियाडवाला याच्या प्रेमात पडली. साजिद हा तब्बूची बेस्ट फ्रेंड दिव्या भारती हिचा पती होता. दिव्या आणि तब्बूमध्ये खूपच चांगली मैत्री होती. दरम्यान दिव्याचे निधन झाले. त्यामुळे एकटा पडलेला साजिद आणि एकटी तब्बू जवळ आले. अशात साजिदने तब्बूला लग्नाची मागणी घातल्याचेही बोलले जाते. मात्र तब्बूने साजिदच्या मागणीला स्पष्ट शब्दात नकार दिला होता. 

त्यामुळे दोघे दूर गेले. कालांतराने तब्बू पुन्हा प्रेमात पडली. तब्बूच्या आयुष्यात साउथचा सुपरस्टार नागार्जुन आला होता. दोघांमध्ये अनेक वर्ष अफेअर चाललं. मात्र नागार्जुनचं आधीच लग्न झालं होतं. आणि तो आपल्या पत्नीला सोडून तब्बूसोबत लग्न करण्यास तयार नव्हता. असे म्हटले जाते की, हे दोघे तब्बल दहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. तब्बूसाठी नागार्जुनने हैदराबाद येथे एक घरही खरेदी केले होते. परंतु पुढे त्यांचे नाते टिकू शकले नाही.