आपल्या दुसऱ्या लग्नातही खूश नाही 'ही' टीव्ही अभिनेत्री!

एकता कपूरची मालिका बडे अच्छे लगते है ची लोकप्रिय अभिनेत्री चाहत खन्नाने पाच वर्षांपूर्वी धुमधडाक्यात लग्न केले.

Updated: Jul 31, 2018, 10:03 AM IST
आपल्या दुसऱ्या लग्नातही खूश नाही 'ही' टीव्ही अभिनेत्री! title=
फोटो सौजन्य- Chahat Khanna/इंस्टाग्राम

मुंबई : एकता कपूरची मालिका बडे अच्छे लगते है ची लोकप्रिय अभिनेत्री चाहत खन्नाने पाच वर्षांपूर्वी धुमधडाक्यात लग्न केले. या नव्या नात्यामुळे ती प्रचंड खूश होती. तिचा हा आनंद सोशल मीडियावरील पती फरहान मिर्जा सोबतच्या रोमांटिक फोटोजमधून व्यक्त होत होता. इतकंच नाही तर त्यांना दोन मुली देखील आहेत. जौहर आणि अमायरा. पण गेल्या काही दिवसांपासून या अभिनेत्रीच्या सोशल मीडिया पोस्टवरुन तिचे वैवाहिक आयुष्य तणावपूर्ण असल्याचे दिसून येते.

चाहत खन्ना मिर्जाने अलिकडेच इंस्टाग्रामवर आपल्या मुलीसोबतचा एक फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करताना तिने लिहिले की, माझ्या आयुष्याचे एकच ध्येय आहे की, मी तुमचे आयुष्य परीप्रमाणे बनवू. त्याचबरोबर तिने singlemom हा हॅशटॅग वापरला आहे. एकटीने मुलींचा सांभाळ करणारऱ्या या अभिनेत्रींचे वैवाहिक आयुष्य तणावपूर्ण असल्याचा अंदाज यावरून लावला जात आहे.

 

My life has this only reason to make ur life a farytale #zohar #amaira @zomairababygirls #mummasgirls #family #singlemom #sibblings #daughters #Mylife #myhome #angels #mysouls #love #mama

A post shared by Chahatt Khanna (@chahattkhanna) on

अलिकडेच चाहत खन्नाने आपला वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी तिने एक फोटो पोस्ट केला. पण त्यासोबत लिहिलेला मजकूर पाहून असे वाटते की, तिच्या आयुष्यात काहीच ठिक नाहीये. चाहतने पोस्ट केले की, जेव्हा आयुष्य अंधारातून जाते तेव्हा ते ताकदवान होते. अंधाराची भीती राहत नाही. हिऱ्याच्या या सुंदर अंगठीने माझा वाढदिवस खास केला.

चाहत खन्नाचे पहिले लग्न भरत नरसिंहानीसोबत झाले होते. दोघांची पहिली भेट २००२ मध्ये झाली. तेव्हा चाहत फक्त १६ वर्षांची होती. २००६ मध्ये दोघे विवाहबद्ध झाले. पण काही महिन्यातच हे नाते तुटले. भरतवर तिने मारहाणीचा आरोप केला होता. फेब्रुवारी २०१३ मध्ये चाहतने फरहान मिर्जासोबत विवाह केला.