ऋषी‌ कपूर यांच्या‌ मृत्युनंतर आलियानं व्यक्त केल्या 'या' ह्रदयस्पर्शी भावना

आलियाची भावनीक पोस्ट 

Updated: Apr 30, 2020, 09:57 PM IST
ऋषी‌ कपूर यांच्या‌ मृत्युनंतर आलियानं व्यक्त केल्या 'या' ह्रदयस्पर्शी भावना title=

मुंबई : आज सकाळी पावणे नऊच्या सुमार ज्येष्ठ अभिनेता ऋषी कपूर यांच निधन झालं. संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. 'चॉकलेट बॉय' म्हणून ओळखले जाणारे ऋषी कपूर आज आपल्यात नाहीत ही गोष्ट अनेकांना मान्य करण कठीण होतं. अशावेळी कपूर कुटुंबियांवर तर दुःखाचा डोंगर कोसळला होता. अशावेळी त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी होती ती अभिनेत्री आलिया भट्ट. दिवसभर एका खंबीर आधाराप्रमाणे रणबीरसोबत उभी राहिल्यानंतर पहिल्यांदा आलियाने आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत रिशी अंकल आम्हाला तुमची आठवण येईल... अशी भावना व्यक्त केली. 

आलिया भट्टची हृदयस्पर्शी भावना 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Alia Bhatt  (@aliaabhatt) on

मी या सुंदर व्यक्तीमत्व असलेल्या व्यक्तीबद्दल काय बोलू? या व्यक्तीमुळे माझ्या आयुष्यात भरपूर प्रेम आणि चांगूलपणा अनुभवता आला. आज प्रत्येकजण द लेजेंड ऋषी कपूर यांच्याबद्दल बोलत आहेत आणि मी देखील त्यांनी माझ्या आयुष्यात असंच ओळखत होते. पण गेल्या दोन वर्षांपासून मी त्यांना ओळखलं ते एक मित्र म्हणून, चायनिजवर प्रचंड प्रेम करणारे, सिनेप्रेमी, लढवय्ये, नेता, सुंदर कथाकार, महत्वाचं म्हणजे ट्विटरसाठी अत्यंत उत्कट असणारे आणि उत्तम वडिल. 

या गेल्या दोन वर्षांत मला त्यांच्याकडून जे प्रेम मिळालं ती त्यांच्याकडून मारलेली एक मिठीच होती. मी या संपू्र्ण जगाचे आभार मानतो कारण मला ही संधी उपलब्ध झाली. आज सगळ्यांनाच ते आपल्या कुटुंबातील वाटत आहेत. कारण त्यांनी तसंच आपल्याला प्रेम दिलं आहे. लव यू ऋषी अंकल.... 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

beautiful boys 

A post shared by Alia Bhatt  (@aliaabhatt) on

या शब्दांमध्ये आलिया भट्टने ऋषी कपूर यांच्या बद्दलच्या आपल्या भावना सोशल मीडियावर शेअर केल्या. तिच्या प्रत्येक शब्दात आपुलकी होती. आपलेपणा होता. ऋषी कपूर यांच असं अचानक जाण तिच्या मनाला चटका लावून गेलं हे नक्की. 

आम्हाला तुमची खूप आठवण येईल... तुम्ही जे काही दिलं त्याबद्दल खरंच आभारी आहे.