69 वर्षानंतर Air India ची मालकी पुन्हा Tata group कडे; आज प्रक्रीया पूर्ण होण्याची शक्यता

Tata Group / Air India : एअर इंडियाचा मालकी आज टाटा समूहाकडे सोपवली जाणार आहे. गेल्या वर्षी टाटांनी 18,000 कोटी रुपयांची बोली लावून एअर इंडियामधील भारत सरकारचा 100% हिस्सा विकत घेतला होता.

रामराजे शिंदे | Updated: Jan 31, 2022, 06:03 PM IST
69 वर्षानंतर Air India ची मालकी पुन्हा Tata group कडे; आज प्रक्रीया पूर्ण होण्याची शक्यता title=

रामराजे शिंदे, झी २४ तास, नवी दिल्ली : आज एअर इंडियाची मालकी टाटा समुहाकडे सोपवण्यात येणार आहे. भारत सरकारने सुमारे 69 वर्षांपूर्वी टाटा समुहाची कंपनी विकत घेतली होती. परंतू पुन्हा कंपनीची मालकी पुन्हा टाटा समूहाकडे जाणार आहे. गेल्या वर्षी 8 ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने बोली लावल्यानंतर 18,000 कोटी रुपयांना टाटा ग्रुपच्या एअर इंडियाला टेल्स प्रायव्हेट लिमिटेडला विकले. एअर इंडियाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, सर्व औपचारिकता पूर्णत्वास आली असून ही आज विमानसेवा टाटा समूहाकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे.

पायलट संघटनांचा विरोध
इंडियन पायलट गिल्ड (IPG) आणि इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशन (ICPA) या दोन एअरलाइन पायलट युनियनने एअर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापनाला कारवाईचा इशारा दिला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या थकीत देयकांमध्ये कपात होण्याची शक्यता वर्तवली आहे. 

याशिवाय अन्य दोन युनियन्सनी विमान उड्डाणांच्या आधी विमानतळावरील वैमानिकांचा बॉडी मास इंडेक्स (BMI) मोजण्याच्या कंपनीच्या 20 जानेवारीच्या आदेशाला विरोध केला आहे. एअर इंडिया एम्प्लॉईज युनियन आणि ऑल इंडिया केबिन क्रू असोसिएशन यांनी दत्त यांना पत्र लिहून या आदेशाला विरोध केला आहे, असे म्हटले आहे की ते अमानवीय आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या नियमांचे उल्लंघन आहे.

टाटा समूहाची ही तिसरी एअरलाइन 
एअर इंडियाच्या विक्रीच्या घोषणेच्या तीन दिवसांनंतर, गेल्या वर्षी 8 ऑक्टोबर रोजी, टाटा समूहाला एक पत्र जारी करण्यात आले होते, ज्यामध्ये सरकारने त्यांचे 100 टक्के हिस्सा विकण्याचे स्पष्ट केले.
2003-04 नंतर केंद्र सरकारकडून करण्यात आलेले हे पहिले खाजगीकरण आहे. त्याचवेळी एअर इंडिया हा टाटाचा तिसरा एअरलाइन ब्रँड असेल. कारण कंपनीकडे आधीच AirAsia India आणि Vistara मध्ये भागीदारी आहे.

स्पाइसेटनेही लावली होती बोली
गेल्या वर्षी केंद्र सरकारने एअर इंडियामधील 100 टक्के हिस्सा विकण्यासाठी 12,906 कोटी रुपयांची बेसिक किंमत ठेवली होती. 8 ऑक्टोबर रोजी, स्पाइसजेटचे प्रवर्तक अजय सिंग यांच्या नेतृत्वाखालील कंसोर्टियमने 15,100 कोटी रुपयांची बोली लावली. त्याच वेळी टाटाने 18,000 कोटी रुपयांची बोली लावून ही बोली जिंकली.