कंडोमच्या पाकिटामुळं उलगडलं खुनाचं गूढ; पोलिसांनी असा घेतला आरोपीचा शोध

Condom Packet Helps Police To Solved Murder: कंडोमच्या पाकिटामुळं पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. पोलिसांनी हत्याकांडाचा उलगडा केला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 29, 2023, 01:08 PM IST
कंडोमच्या पाकिटामुळं उलगडलं खुनाचं गूढ; पोलिसांनी असा घेतला आरोपीचा शोध title=
ajab singh murder case solved with help of condom Packet

Condom Packet Helps Police To Solved Murder Mystry: एका गुन्ह्याच्या तपासात कंडोममुळं आरोपींपर्यंत पोहोचणे पोलिसांना (Police) शक्य झालं आहे. ही अजब-गजब घटना उत्तरप्रदेशमधील (Uttar Pradesh Crime) आंबेडकरनगरमध्ये घडली आहे. सर्कस कलाकार अजब सिंह हत्याकांडात पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. एका कंडोमच्या पाकिटामुळं (Condom Packet) गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

आरोपी शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान

11 जून रोजी भितरीडीह गावातील बंद असलेल्या शाळेत तरुणाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तपास सुरु केला. गुन्हा घडला तिथे रक्त, मयत तरुणाचे केस, आमली पदार्थ आणि एक कंडोमचे पाकिट मिळाले होते. पोलिसांकडे सुरुवातीला इतकेच पुरावे होते. हे सर्व पुरावे ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. 

कंडोम पाकिट आणि पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली

पोलिसांनी औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली तेव्हा घटनास्थळी जे कंडोमचे पाकिट सापडले होते. त्याची विक्री उत्तरप्रदेशमधील पश्चिमभागात जास्त होते, अशी माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत त्या भागातून आलेल्या लोकांची चौकशी करण्यास सुरुवात केली. तपासात समोर आले की, सरहानपुर जिल्ह्यातून आलेल्या तीन युवकांनी गावातील आरती नावाच्या मुलीच्या घरात राहून तिथेच सर्कस लावली होती. मात्र, घटनेनंतर ते सर्वच फरार आहेत. 

पोलिसांनी फरार असलेल्या सर्वांची मोबाइल क्रमाक मिळवून त्यांचे लोकेशन ट्रेस करण्यास सुरुवात केली. तिघांचे लोकेशन सहारनपूर हे दाखवत होते. पोलिसांचे एक पथक तिथे दाखल झाले. त्यानंतर आरोपी इमरान, फरमान आणि इरफान या तिघांना अटक केली आहे. 

हत्येची कबुली दिली

पोलिसांनी चौकशी करताच त्यांनी अजयची हत्या का केली याचा खुलासा केला आहे. अजय सिंहचे इरफानच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. घटनेच्या दिवशी तिघा आरोपी अजयला घेऊन शाळेत गेले. तिथे त्याला जबरदस्ती दारु पाजली व त्याची हत्या केली. सुरुवातीला इरफान त्यांची हत्या करण्याच्या विरोधात होता. मात्र नंतर तिघांनी मिळून त्याला जिवंत जाळले. यातच त्याचा मृत्यू झाला. 

पोलिसांकडून तिघांना अटक

अजयची हत्या झाल्यानंतर तिघे आरोपी पुन्हा आरतीच्या घरी आले. तिथून बाईकवरुन ते मऊ या ठिकाणी गेले. तिथे बाईक तीन हजार रुपयांसाठी गहाण ठेवली त्यानंतर पुन्हा सहारनपूरला आले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.