शारीरीक संबध ठेवण्यासाठी नववधूचा नकार, मग नवऱ्याने उचलले हे पाऊल

 तिच्या नवऱ्याने आणि कुटूंबियांनी समजून घेऊन तिला थोडा वेळ द्यायला हवा. परंतु...

Updated: Jul 23, 2021, 05:33 PM IST
शारीरीक संबध ठेवण्यासाठी नववधूचा नकार, मग नवऱ्याने उचलले हे पाऊल title=

रतलाम : लग्न हे प्रत्येक वर वधूसाठी खूप मोठी गोष्टी असते, कारण त्या दिवसानंतर त्या दोघांच्याही आयुष्याची एक नवीन सुरुवात होणार असते. खरेतर यात मोठी परीक्षा असते ती नववधूची, कारण तिला नवीन कुटूंबात जाऊन नवीन लोक, नवीन चालिरितींना समजून घ्यायचं असतं, जे तिच्यासाठी फार मोठी गोष्ट असते. म्हणून हा क्षण जितका नववधूसाठी आनंदाचा दिवस असतो, तितकीच तिच्या मनाची घालमेल देखील होत असते, ही गोष्ट तिच्या नवऱ्याने आणि कुटूंबियांनी समजून घेऊन तिला थोडा वेळ द्यायला हवा. परंतु काही लोकांना हे कळत नाही आणि ज्यामुळे ते काही तरी टोकाचं पाऊल उचलतात.

मध्य प्रदेशातील रतलाममधील एका अशीच आगळी वेगळी घटना समोर आली आहेत. जिथे एका नवविवाहित पुरुषाने लग्नाच्या पाच दिवसानंतरच एक भयानक पाऊल उचलले. मीडियावृत्तानुसार, नवीन लग्न झालेला व्यक्ती आपल्या पत्नी म्हणजेच नववधूवर नाराज होता, जी त्याला आपल्याबरोबर शारीरिक संबंध ठेवू देत नव्हता. 

या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, त्याची पत्नी लग्नाच्या चार दिवसानंतरही शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत होती, यामुळे संतापून त्याने पत्नीची हत्या केली.

अंजली सेंधवाचे 15 जून रोजी शिवगडच्या दिलीप सोनोवाबरोबर लग्न झाले होते. लग्नानंतर पाच दिवसांनी दिलीप पत्नीसह जिल्हा रुग्णालयात दाखल झाला, त्याने रुग्णालयात सांगितले की, त्याची बायको बाथरूममध्ये पडली. येथे डॉक्टरांनी अंजलीला पाहून तिला मृत घोषित केले. त्यानंतर ही बाब पोलिसांपर्यंत पोहोचली आणि मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले. त्याचा अहवाल 10 जुलै रोजी आला होता, ज्यामध्ये असे समजले की, अंजलीचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला होता.

यानंतर पोलिसांना दिलीपचा संशय आला असता, त्यांनी त्याची चौकशी केली परंतु तो काही बोलायला तयार नव्हता. त्यानंतर पोलिसांनी त्याला ठाण्यात बोलावून कसून चौकशी केली असता. दिलीप घाबरला आणि त्याने आपले तोंड खोलले.

मीच नवी वधूची हत्या केल्याचे त्याने सांगितले. दिलीपने सांगितले की, त्याची पत्नी त्याला शारीरीक संबंध ठेवायला देत नव्हती, ज्याचा त्याला राग आला आणि त्याने रागाने त्याच्या बायकोचे नाक, तोंड आणि गळा दाबून हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि तुरुंगात पाठविले आहे.