हत्येचा कट करुन महिलेला मारले... पण 3 वर्षाच्या मुलामुळे सत्य समोर आले

 पोलिसांना दुपारी मंदिरापासून दोनशे मीटर अंतरावरील झाडीतून एका महिलेचा मृतदेह आढळला.

Updated: Jul 8, 2021, 09:12 PM IST
हत्येचा कट करुन महिलेला मारले... पण 3 वर्षाच्या मुलामुळे सत्य समोर आले title=

मुंबई : एका तीन वर्षाच्या निरागस मुलाने आपल्या आईच्या हत्येचे रहस्य उघडले. पोलिसांनी हा निरागस मुलगा आणि मृत महिलेचा संबंध साधला असता खळबळजनक घटना उघडकीस आली. खरंतर, मंगळवारी पहाटे सिंहवाहिनी मंदिर रैगवा येथे तीन वर्षांचा मुलगा रडत होता. हे पाहाताच ग्रामस्थांच्या माहितीवरून पोलिस त्या ठिकाणी पोहोचले आणि त्याला घेऊन त्याच्या पालकांचा शोध सुरू केला.

त्यानंतर पोलिसांना दुपारी मंदिरापासून दोनशे मीटर अंतरावरील झाडीतून एका महिलेचा मृतदेह आढळला. परंतु त्या महिलेचीही ओळख पटने कठीण होते. अशा परिस्थितीत पोलिसांनी या निष्पाप मुलाचा आणि मेलेल्या महिलेचा संबंध जोडून तपास घ्यायला सुरवात केली. पोलिस या मुलासोबत मृत महिलेकडे पोहोचले तेव्हा रडणार्‍या निरागस मुलाने त्या महिलेला आईला म्हणून हाक मारली.

त्यानंतर या मुलाकडे विचारपूस केली असता, या मुलाकडून वडिलांनी ही हत्या केली असल्याचे समोर आले आहे. परंतु तो स्वतःचे किंवा त्याच्या पालकांचे नाव सांगू शकला नाही.

त्याचवेळी घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर NH-30 वर एक कार आणि जीपची धडक झाली. संशयाच्या आधारे पोलिसांनी या दोन्ही धडकलेल्या वाहनांचा शोध घेतला असता हे प्रकरण आणखीच गुंतंत गेलं. कारण या एका कारमध्ये महिलेच्या तुटलेल्या बांगड्या आणि या मुलाचे कपडे सापडले.

या तपासणीत ही महिला आणि हा 3 वर्षाचा मुलगा या वाहनमधूनच आल्याचे स्पष्ट झाले. या महिलेची हत्या केल्यानंतर या मुलाला येथेच सोडून हा माणूस सोडून गेल्याच्या संशयावरुन पोलिसांचा तपास सुरू आहे.

हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली

क्रॅश झालेली बोलेरो ही कटनी जिल्ह्यातील रेठी गावची असल्याचे सांगितले जात आहे. मुलाने मृत महिलेला त्याची आई असल्याचे सांगितले आणि वडिलांनी तिला ठार मारले असे देखील त्याने सांगितले. त्यामुळे या माणसाने महिलेची हत्या केल्यानंतर बोलेरोद्वारे मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलिसांनी व्यक्तं केले आहे.

प्रभारी पोलिस हरीश दुबे आणि एसडीओपी हिमाली सोनी यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या सर्व बाबींचा सखोल तपास केला. आतापर्यंतच्या अवघ्या 12 तासांत संपूर्ण कथा तपासात समोर आली आहे.

महिलेच्या हातावर लक्ष्मी असे नाव गोंदवले गेले आहे. त्यानंतर या निष्पाप मुलाच्या सांगण्यावरुन वडिलांनी या महिलेची हत्या केली असल्याचा प्रकार उघडकीस आला. अशा परिस्थितीत पोलिसांनी तपास केला आणि अपघातातील नुकसान झालेल्या बोलेरो वाहनाच्या मालकापर्यंत पोहचले.

वाहन मालकापर्यंत पोहचल्यानंतर पोलिसांच्या असे लक्षात आले की, अखिलेश यादव यांचे मृत लक्ष्मीबाईशी संबंध आहे. गेल्या सहा महिन्यांपासून लक्ष्मी अखिलेशकडे राहत होती. पण दीड महिन्यांपूर्वी अखिलेशने दुसर्‍या कोणाशी तरी लग्न केले. यामुळे लक्ष्मी त्याला त्रास देऊ लागली.

त्यानंतर लक्ष्मीच्या त्रासाला संतापून अखिलेशने तीन साथीदारांसह आपल्या मार्गापासून दूर करण्याचा कट रचला होता. प्रथम, जवळपास फिरण्याच्या बहाण्याने त्याने लक्ष्मी आणि तिच्या 3 वर्षाच्या मुलाला गाडीतून आणले.

त्यानंतर अमदराजवळ महिलेचा दोरीने गळा आवळून हत्या करण्यात आली आणि त्यानंतर या मुलाला जवळच असलेल्या मंदिराजवळ सोडले.

परंतु त्यानंतर तो घरी जात असताना त्याच्या गाडीचा अपघात झाला. त्यामुळे त्याला गाडी तेथेच सोडून जावी लागली.

आरोपीची माहिती मिळताच पोलिसांनी फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस सादर केली. या संपूर्ण प्रकरणात हा लहान बाळ मुख्य साक्षीदार झाला आहे.