Miss call मुळे झालं प्रेम, पण सत्य कळताच भरचौकात महिलेने पतीला...

प्रेमात पडले मग लग्न केलं पण नंतर सत्य समोर आल्यानंतर भररस्त्यात राडा.

Updated: Sep 15, 2022, 11:03 PM IST
Miss call मुळे झालं प्रेम, पण सत्य कळताच भरचौकात महिलेने पतीला... title=

मुंबई : प्रेमात फसवणूक झालेल्या विवाहितेने पतीला जाहीरपणे पकडून बेदम मारहाण केल्याने एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. प्रकरण पटना गया रेल्वे विभागातील कोर्ट हॉल्ट स्टेशनचे आहे. भरदिवसा पतीला पत्नीने धडा शिकवला. विवाहितेने पतीवर प्रेमाच्या जाळ्यात अडकून फसवणूक केल्याचा आरोप केलाय. शेखपुरा जिल्ह्यात राहणाऱ्या एका विवाहित महिलेने सांगितले की, मिस्ड कॉलद्वारे तिची ओळख बेला येथील रहिवासी मनोहरशी झाली. त्यानंतर मनोहरने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून मार्चमध्ये लग्न करून दिल्लीला नेले.

प्रेमाच्या जाळ्यात फसताना त्याने स्वतः अविवाहित असल्याचे सांगितले होते. पण नंतर ते बेलाला दिल्लीहून त्याच्या घरी घेऊन गेले तेव्हा त्याची पत्नी आणि मुलेही तिथे होती. त्यानंतर दोघांमध्ये भांडण वाढले आणि घटस्फोट देण्यासाठी दोघेही कोर्टात आले, पण पती वेळेवर कोर्टात पोहोचू शकला नाही. नंतर पत्नीला पती कोर्ट स्टेशनच्या बाहेर दिसला, त्यानंतर विवाहित महिलेचा संयम सुटला आणि तिने त्याला पकडून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला तो पत्नीच्या तावडीतून निसटला, मात्र तेथे उपस्थित लोकांनी त्याला पकडले. पकडल्यानंतर लोकांनी पतीला पत्नीच्या ताब्यात दिले. या घटनेवेळी मोठी गर्दी झाली होती. नंतर स्थानिकांच्या पुढाकाराने प्रकरण शांत झाले.