लष्कर दिनी जवानांचं चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानचे ७ सैनिक ठार

पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतानं सडेतोड उत्तर दिलं आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 15, 2018, 01:52 PM IST
लष्कर दिनी जवानांचं चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानचे ७ सैनिक ठार title=

जम्मू-काश्मीर : पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतानं सडेतोड उत्तर दिलं आहे. 

भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे ७ सैनिक मारले गेले आहेत. भारताने केलेल्या या कारवाईत अनेक पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. या कारवाईच पाकिस्तानचे ४ जवान जखमी देखील झाले आहेत.

पाकिस्तानकडून सतत सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असतं. दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी म्हणून पाकिस्तानचे सैनिक त्यांना मदत करतात. पण भारतीय जवान त्यांचा हा प्रयत्न नेहमी हाणून पाडतात.

‘तोवर लष्कर शांत बसणार नाही’

लष्कर प्रमुखांनी जम्मू काश्मीरबाबत आपली मतं पुन्हा नोंदवली. जोवर जम्मू काशमीरमध्ये शांतता प्रस्थापित होत नाही तोवर भारतीय लष्कर शांत बसणार नाही. खो-यात शांत प्रस्थापित करण्यासाठी रणनिती तयार करणं आवश्यक आहे, सैन्य अभियानं वाढवणं गरजेंच आहे असंही ते म्हणाले.