भारतीय जवानांनी ३ दहशवताद्यांना केलं ठार

जम्मू-कश्मीरच्या नौगाम सेक्टरमध्यु सुरक्षा रक्षकांना मोठं यश मिळालं आहे. भारतीय सीमाभागातून घुसखोरी करणाऱ्या ३ दहशतवाद्यांना जवानांनी ठार केलं आहे. सुरक्षा रक्षकांनी रविवार रात्री सीमा भागाजवळ असलेल्या नौगाम सेक्टरमध्ये काही संशयित हालचाल दिसली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना घेरलं आणि आत्मसमर्पण करणयासाठी सांगितलं. पण दहशतवाद्यांनी फायरिंग सुरु केली. त्यानंतर काही तास चाललेल्या या चकमकीत ३ हदहशतवाद्यांना कंठस्नान गालण्यात आलं. अजून काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती आहे. जवानांचं या भागाच सर्च ऑपरेशन सुरु आहे.

Updated: Jul 10, 2017, 03:43 PM IST
भारतीय जवानांनी ३ दहशवताद्यांना केलं ठार title=

श्रीनगर : जम्मू-कश्मीरच्या नौगाम सेक्टरमध्यु सुरक्षा रक्षकांना मोठं यश मिळालं आहे. भारतीय सीमाभागातून घुसखोरी करणाऱ्या ३ दहशतवाद्यांना जवानांनी ठार केलं आहे. सुरक्षा रक्षकांनी रविवार रात्री सीमा भागाजवळ असलेल्या नौगाम सेक्टरमध्ये काही संशयित हालचाल दिसली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना घेरलं आणि आत्मसमर्पण करणयासाठी सांगितलं. पण दहशतवाद्यांनी फायरिंग सुरु केली. त्यानंतर काही तास चाललेल्या या चकमकीत ३ हदहशतवाद्यांना कंठस्नान गालण्यात आलं. अजून काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती आहे. जवानांचं या भागाच सर्च ऑपरेशन सुरु आहे.

मागील काही दिवसांपासून LoC वर पाकिस्तानकडून सीजफायरचं उल्लंघन सुरु आहे. दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास मदत व्हावी म्हणून पाकिस्तानचं सैन्य फायरिंग करतं. पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय जवानांकडूनही जोरदार उत्तर देण्यात आलं. ८ जुलैला देखील पाकिस्तानकडून पुंछमध्ये फायरिंग झाली होती.