मोदी हिरव्या रंगाचे कपडे का घालत नाहीत?- शशी थरुर

आज स्वामी विवेकानंद असते तर या गुंडांनी त्यांच्यावरही पेट्रोल टाकले असते. 

Updated: Aug 6, 2018, 01:16 PM IST
मोदी हिरव्या रंगाचे कपडे का घालत नाहीत?- शशी थरुर title=

नवी दिल्ली: पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यांवर असताना वेगवेगळे पेहराव करतात, टोप्या घालतात. मग ते फक्त मुस्लिमांची टोपीच का घालत नाही, असा सवाल काँग्रेस नेते शशी थरुर यांनी विचारला. ते रविवारी तिरुवनंतपुरम येथील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यांवर असताना वेगवेगळे पेहराव करतात, पगड्या घालतात. मात्र, अजूनही ते हिरव्या रंगाचे कपडे घालत नाहीत आणि मुस्लीम पद्धतीची टोपी घालत नाहीत, असे शशी थरुर यांनी म्हटले. 

यावेळी थरुर यांनी मॉब लिचिंगच्या घटनांवरुनही भाजपला लक्ष्य केले. त्यांनी स्वामी अग्निवेश यांच्यावर टीका करताना म्हटले की, आज स्वामी विवेकानंद असते तर या गुंडांनी त्यांच्यावरही पेट्रोल टाकले असते. त्यांना खाली पाडून मारले असते, असे थरुर यांनी सांगितले.