पाण्यात स्कूल बस अडकल्यानं ५० विद्यार्थ्यांचे प्राण धोक्यात

स्कूल बस अडकल्यानं ५० विद्यार्थ्यांचे प्राण धोक्यात आले.

Updated: Aug 23, 2018, 02:45 PM IST

राजस्थान : राजस्थानच्या दौसा शहरात आज एक स्कूल बस अडकल्यानं ५० विद्यार्थ्यांचे प्राण धोक्यात आले. भुयारी मार्गात अचानक पाणी वाढल्यानं बस अडकली. या बसमध्ये सुमारे ५० विद्यार्थी टपावर अडकले. स्थानिक नागरिकांनी त्यांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली.

शर्थीचे प्रयत्न 

 पावसामुळे साचलेल्या पाण्यात ही स्कूलबस अडकली आहे. प्रचंड पावसामुळे नदीला पूर आला होता. यामध्ये दुर्देवाने हे शाळेचे विद्यार्थी अडकले आहेत. अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिक या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. दोरीच्या सहाय्याने या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरूयं. काही विद्यार्थ्यांना या पाण्यातून बाहेर काढण्यास यश आल्याचे लाईव्ह दृश्य दिसत आहे.