4 वर्षाच्या रिलेशनशिपनंतर लग्न, पण शारीरक संबंधासाठी बायकोकडून नकार... यामागील कारण धक्कादायक

अनेक प्रेमी जोडपं एकमेकांशी लग्न करण्याचे स्वप्न पाहातात. परंतु सर्वांच्याच नशीबात असं असतंच असं नाही.

Updated: May 17, 2022, 06:06 PM IST
4 वर्षाच्या रिलेशनशिपनंतर लग्न, पण शारीरक संबंधासाठी बायकोकडून नकार... यामागील कारण धक्कादायक title=

मुंबई : अनेक प्रेमी जोडपं एकमेकांशी लग्न करण्याचे स्वप्न पाहातात. परंतु सर्वांच्याच नशीबात असं असतंच असं नाही. कुटुंबाच्या विरोधामुळे या लोकांना लग्न करण्यासाठी संमती मिळत नाही. ज्यामुळे अनेक लोकं हे टोकाचं पाउल उचलतात. तसेच ज्या लोकांच्या घरातून त्यांच्या नात्यासाठी काहीही तक्रार नसते, असे जोडपं लग्न करुन आपलं सुखी आयुष्य एकमेकांसोबत घालवतात.

परंतु यूपीच्या मुरादाबादमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. हे प्रकरण इतकं विचित्र आहे की, नक्की काय काय झालं असावं असा विचार करत तुम्ही तुमचा वेळ वाया घालवाल.

खरंतर एका कपलने 4 वर्षाच्या रिलेशनशिपनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांच्या घरातील लोकांचा या लग्नाला विरोध होता. मग अनेक विनंती आणि घरच्याना तयार करुन या जोडप्याचं लग्न अखेरल संपन्न झालं. परंतु लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधून नवरदेवाला असं काही तरी म्हणाली जे ऐकून नवरदेवाच्या पाया खालची जमीनच सरकली.

खरंतर नववधूने लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेवाशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता. तिने आपल्या नवऱ्याला स्पष्ट सांगितले की, मला शारीरिक संबंध ठेवायला आवडत नाहीत. मी अशीच तुझ्यासोबत राहिन. ज्यानंतर नवऱ्याला धक्काच बसला आणि त्याने त्याच दिवशी बायकोपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

हे प्रकरण पंचायतीपर्यंत पोहोचले, तेथे या प्रकरणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु तो अपयशी ठरला. त्यानंतर हे प्रकरण महिला उत्थान केंद्रापर्यंत पोहोचले. ज्यानंतर या दोघांनी स्वेच्छेने वेगळे राहण्याचे मान्य केले.