Republic Day 26th January: 26 जानेवारीलाच का साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन?

Why Republic Day Celebrated on 26th January: 1950 पासून प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी साजरा केला जात असला तरी त्याचा संदर्भ त्यापूर्वीपासून म्हणजेच 1930 पासूनचा असून हाच दिवस का निवडण्यात आला यामागे खास कारण आहे.

Updated: Jan 23, 2023, 04:16 PM IST
Republic Day 26th January: 26 जानेवारीलाच का साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन? title=
Why Republic Day Celebrated on 26th January (File Photo PTI)

2023 Republic Day India: 26 जानेवारीला संपूर्ण देशभरामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन (Republic Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस सर्वच भारतीयांसाठी खास असतो. सर्व धर्म, जाती आणि संप्रदायामधील लोक आपल्यातील वाद आणि मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येत हा राष्ट्रीय सण साजरा करतात. देशासाठी हा दिवस खास असल्याने दरवर्षी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये इंडिया गेटपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथावर परेड आणि रॅलीचं आयोजन केलं जातं. मात्र 26 जानेवारीलाच प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो? (Why Republic Day Celebrated on 26th January?) इतर कोणत्याही दिवशी प्रजासत्ताक दिन साजरा का केला जात नाही? जाणून घेऊयात यामागील खास कारण...

10 वाजून 18 मिनिटांनी लागू झालं संविधान

यावर्षी भारत 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. आजपासून 73 वर्षांपूर्वी म्हणजे 1950 साली 26 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजून 18 मिनिटांनी देशामध्ये संविधान लागू झालं. 26 जानेवारीच्या दिवशीच संविधान लागू करण्यामागे आणखीन एक मोठं कारण होतं. 1930 साली भारतामध्ये राष्ट्रीय काँग्रेसने भारताला पूर्णपणे स्वातंत्र्य देण्याचा ठराव संमत केला होता.

26 तारखेचं कनेक्शन 1930 पासून...

इतिहासाच्या जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार 1929 मध्ये भारताचे पहिले पंतप्रपधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय काँग्रेसने घोषणा केली होती. या घोषणेनुसार इंग्रज सरकार 26 जानेवारी 1930 पर्यंत भारताला डोमनियन स्टेटचा दर्जा द्यावा आणि याच दिवशी पहिल्यांचा भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात यावा, अशी ही मागणी होती. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासूनच 26 जानेवारी हा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जायचा. पूर्ण स्वराज्य देण्याच्या मागणीनंतर स्वांत्र्य मिळाल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आलं. त्यामुळे हाच दिवस देशाचा प्रजासत्ताक दिवस म्हणून घोषित करण्यात आला.

308 जणांनी केल्या स्वाक्षऱ्या

प्रत्येक देशातील कारभार नियमांनुसार चालावा म्हणून एक नियमावली तयार केली जाते. वेगवेगळ्या देशांमध्ये या नियमावलीला वेगवेगळं नाव दिलं जातं. भारतामध्ये या नियमावलीचा संविधान असं म्हणतात. भारताचं संविधान डॉक्टर भीमराव म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलं आहे. त्यांनी संविधानाचा मसूदा तयार केला. त्यानंतर त्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या. यानंतर एक समिती तयार करुन संविधानाबद्दलची सविस्तर चर्चा झाली. कमिटीमध्ये एकूण 308 सदस्य होते त्यांनी 24 जानेवारी 1950 रोजी संविधानला कायदा म्हणून मंजूरी दिली. संविधानाच्या दोन प्रतिंवर या 308 सदस्यांनी संमत असल्यासंदर्भातील स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर संविधानला देशाचा कायदा म्हणून मान्यता मिळाली. 

आठडाभर केलं जायचं सेलिब्रेशन

सामान्यपणे आपण 26 जानेवारी रोजी एकच दिवस प्रजासत्ताक दिन साजरा करतो. मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अशी परिस्थिती नव्हती. प्रजासत्ताक दिनानिमित्त एक आठवडा सेलिब्रेशन केलं जायचं. 24 जानेवारीपासूनच हे सेलिब्रेशन सुरु व्हायचं. पहिल्या दिवशी लहान मुलांना राष्ट्रीय वीरता पुरस्कार देऊन सन्मानित केलं जायचं. यंदाच्या वर्षी आजपासून म्हणजेच 23 जानेवारीपासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून स्वातंत्र्य दिनानिमित्त सरकारी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 25 जानेवारी रोजी राष्ट्रपती देशाला संबोधित करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी राजपथावर पडेच्या माध्यमातून भारताच्या एकतेचं दर्शन होतं.