शेतकऱ्यांचा कळवळा सत्तेवर असताना आला नाही- मुख्यमंत्री

कर्जत येथील भाजपच्या प्रवेश कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Feb 4, 2018, 04:57 PM IST
शेतकऱ्यांचा कळवळा सत्तेवर असताना आला नाही- मुख्यमंत्री   title=

कर्जत : राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल करीत त्यांना आणखी १०-१५ वर्षे रस्त्यावर उतरून तेच करायचे आहे,अशी खिल्ली उडवून सवय लावून घ्या असा सल्ला देखील त्यांनी दिला.

भाजपच्या प्रवेश कार्यक्रम

 शेतकऱ्यांचा कळवळा त्यांना सत्तेवर असताना आला नाही अशी टिका त्यांनी या वेळी केली.कर्जत येथील भाजपच्या प्रवेश कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

विरोधकांचा समाचार 

शिवसेनेचे सतत तीन वेळा आमदार म्हणुन निवडून आलेले कर्जत खालापुरचे माजी आमदार देवेंद्र साटम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितत भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला त्यावेळी फडणवीस यांनी राष्ट्रवादीसह विरोधकांचा समाचार घेतला.