Corona : राज्यात गेल्या 6 दिवसात 4 लाख 42 हजार रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात एकीकडे कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या ही वाढत आहे.

Updated: Apr 26, 2021, 09:15 PM IST
Corona : राज्यात गेल्या 6 दिवसात 4 लाख 42 हजार रुग्ण कोरोनामुक्त title=

मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना गेल्या सहा दिवसात राज्यातील 4 लाख 42 हजार 466 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आज राज्यात 71 हजार 736 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यात सर्वाधिक 13 हजार 674 रुग्ण पुण्यातील आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात गेल्या दोन महिन्यापासून दररोज विक्रमी वाढ होत आहे. दररोज रुग्णांची संख्या 60 हजारांच्या वर आहे. 18 एप्रिल रोजी सर्वाधिक 68 हजार 631 रुग्णांची वाढ झाली होती.

राज्यात डॉक्टर्स, नर्स यांच्या प्रयत्नांमुळे रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत. त्यामुळे दररोज मोठी वाढ होत असली तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ही वाढत आहे.

कोणत्या दिवशी किती रुग्णांना डिस्चार्ज

20 एप्रिल - 54 हजार 224 
21 एप्रिलला 54 हजार 985, 
22 एप्रिलला 62 हजार 298, 
23 एप्रिलला 74 हजार 45, 
24 एप्रिलला 63 हजार 818 , 
25 एप्रिलला 61 हजार 450 
26 एप्रिल रोजी 71 हजार 736

एकूण 4 लाख 42 हजार 466 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.