हिंगोलीत गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ

हिंगोली शहरात गुन्हेगारीच प्रमाण वाढतय..  काल रात्री दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत दोघांचा जीव गेलाय. तर 12 जन जखमी आहेत,त्यापैकी दोघे गंभीर जखमी आहेत. 

Updated: Aug 18, 2017, 04:13 PM IST
हिंगोलीत गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ title=

हिंगोली : हिंगोली शहरात गुन्हेगारीच प्रमाण वाढतय..  काल रात्री दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत दोघांचा जीव गेलाय. तर 12 जन जखमी आहेत,त्यापैकी दोघे गंभीर जखमी आहेत. 

या सर्वांना उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आलंय. दोन्ही गटाच्या प्रत्येकी एकाचा या मृतामध्ये समावेश आहे. गजानन महावीर आणि जितेंद्र प्यारेलाल अशी मयतांची नाव आहेत.  घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिका-यासह दंगल नियंत्रक पथकाला येथे पाचारण करण्यात आल होतं. या हाणामारीत लोखंडी रॉड, कोयत्यासह धार दार शस्त्रांचा वापर करण्यात आला.  

गुरुवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास मोची गल्लीत हि घटना घडलीये. घटनेचं नेमक कारण समजू शकल नाही. गांधी चौकातील चप्पलांच्या दुकानावरून हा वाद वाढल्याचं समोर येतंय. दोन्ही गटात अनेक दिवसापासून खटके उडत होते, अशी माहिती आहे. सदर घटनेमुळे हिंगोली शहरात एकच खळबळ उडाली आहे.