विमातळासाठी जमीन संपादनाविरोधात शेतकरी आक्रमक

कल्याणजवळ विमानातळासाठी सरकारानं जबरदस्ती जमीन संपादित केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

Updated: Jun 22, 2017, 11:20 AM IST
विमातळासाठी जमीन संपादनाविरोधात शेतकरी आक्रमक title=

कल्याण : कल्याणजवळ विमानातळासाठी सरकारानं जबरदस्ती जमीन संपादित केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

सरकारच्या जमीन संपादनाविरोधात केलेल्या आंदोलनाला आज सकाळी हिंसक वळण लागलं.  

आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झालेत. संतप्त आंदोलकांनी पोलीसांच्या गाड्यांचीही जाळपोळ केली. 

 मालकीच्या जमीनीवर पेरणी करण्यास मज्जाव केल्यानं शेतकऱ्यांचा संताप टोकाला गेल्याचं पुढे येतं आहे.  आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी कल्याण-मलंगड रस्त्यावर टायर जाळून वाहतूकही बंद पाडली.