कौटुंबिक वादातून जावयाचा चाकू हल्ला

मुंबई : एका कौटुंबिक वादातून जावयाने चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथे घडली. जावयाने आपल्या सासुसह पत्नी आणि मुलावर चाकु हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. दत्तात्रय देशमुख असं जावयाचं नाव आहे. काही दिवसांपासून गीता देशमुख ही आपल्या माहेरी राहत होती. दत्तात्रय पत्नीला नेण्यासाठी मंगरूळपीर येथे आला आणि सासरकडील लोकांकडे पैशांची मागणी करत होता. मात्र पैसे न दिल्याने खवळलेल्या जावयाने मध्यरात्री घराचा दरवाजा वाजवला आणि दार उघडताच सासू, पत्नी आणि सहा महिन्यांच्या मुलावर चाकून हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यात तिघं जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. याप्रकरणी पोलीसांनी आरोपी दत्तात्रय देशमुखला अटक केलीय..