निवडणुकीआधीच पराभवाच्या भीतीने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अश्रू अनावर

'१५ वर्ष जनतेची कामं करूनही...'

Updated: Oct 6, 2019, 01:41 PM IST
निवडणुकीआधीच पराभवाच्या भीतीने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अश्रू अनावर title=
संग्रहित छायाचित्र

जालना : जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार बबलू चौधरी यांना अकोला निकळक गावातील भर सभेत अश्रू अनावर झाले. गेली १५ वर्ष बदनापूर मतदार संघात लोकांची सर्व कामे केली. मतदार संघातील जनतेच्या अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकांच्या अडचणीच्या काळात, सुख-दु:खात सहभागी होऊनही या मतदार संघातून कमी मते मिळतात, असे सांगत चौधरी यांनी यावेळी मला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले. 

गावकऱ्यांनी देखील चौधरी यांना अश्रू अनावर होताच त्यांची समजूत घालत या निवडणुकीत त्यांना साथ देण्याचे आश्वासन दिले. 

चौधरी यांनी आतापर्यंत २ विधानसभा निवडणुका लढवल्या आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता.