मित्र झाला वैरी! दारू आणायला नकार दिला आणि...

कोल्हापुरात एका दारूच्या बाटलीमुळे मित्रच वैरी बनल्याची धक्कादायक घटना समोर आली. 

Updated: Feb 4, 2021, 01:16 PM IST
मित्र झाला वैरी! दारू आणायला नकार दिला आणि... title=

कोल्हापूर: मित्र म्हणजे जीवाभावाचा जीवाला जीव देणारा वेळप्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालणारा. अशी घट्ट मैत्री असलेल्या दोन मित्रांमध्ये एका गोष्टीमुळे वाद वाद झाला. हा वाद टोकाला पोहोचला आणि तरुणानंच आपल्या मित्राची हत्या केली. या घटनेमुळे कोल्हापुरात खळबळ उडाली.

एका दारूच्या बाटलीमुळे मित्रच वैरी बनल्याची धक्कादायक घटना समोर आली. कोल्हापूरजवळील शिरोली दर्ग्यानजीकची हा प्रकार समोर आला. मित्रांनी मिळून तरुणाला दारूची बाटली आणण्यासाठी आग्रह केला. त्यावेळी तरुणानं नकार दिला. तिथे त्यांच्यात वाद झाला. 

दारूची बाटली आणण्यासाठी नकार दिल्याचा भयंकर राग आला. त्याच रागातून दारू आणि गांजाच्या नशेत असलेल्या मित्रांनी तरुणावर चाकूने सपासप वार केले. तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

काळजाचा थरकाप उडवणारी घटना, 5 रुपयांसाठी बापाकडून चिमुकलीची हत्या

अमित राठोड असं मृत तरुणाचं नाव आहे. दारूची बाटली आणण्यासाठी नकार देणं त्याला महागात पडलं. मित्रांनी मिळून त्याची हत्या केली आहे. या प्रकरणाची माहिती शिरोली पोलिसांना समजली. त्यांनी घटनास्ळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. अमित राठोडचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. तर आतापर्यंत संशयित समीर नदाफ आणि योगेश साखरे या दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. या दोघांची शिरोली पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.