गरीबांच्या खात्यात 5 वर्षात 3 लाख 60 हजार देणार- राहुल गांधी

 देशातील 20 टक्के गरीबांच्या खात्यात थेट 3 लाख 60 हजार रुपये पाच वर्षात जमा करणार' असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.

Updated: Apr 4, 2019, 08:07 PM IST
गरीबांच्या खात्यात 5 वर्षात 3 लाख 60 हजार देणार- राहुल गांधी  title=

दिपक भातुसे, झी मीडिया, नागपूर : 'गरिबीवर काँग्रेस पक्ष सर्जिकल स्ट्राईक करणार आहे. देशातील 20 टक्के गरीबांच्या खात्यात थेट 3 लाख 60 हजार रुपये पाच वर्षात जमा करणार' असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. नागपुरमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपाच्या नितीवर जोरदार प्रहार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 लाख रुपये  देण्याचे आश्वासन दिले. तसेच शेतकर्‍यांना योग्य मोबदला देण्याचं आश्वासन दिले होते, मात्र ते पूर्ण केले नाही. आपण हे आश्वासन पूर्ण करायचे असा विचार मी केला आणि त्यासाठी थिंक टँकशी चर्चा केली. देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण न येता देशातील गरीबांच्या खात्यावर पैसे कसे आणि किती टाकता येतील ? त्याची माहिती मागवली. थिंक टँकने प्रसिद्ध अर्थतज्ज्ञांशी चर्चा केली आणि मला 72 हजार रुपयांचा आकडा दिला. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण येणार नाही उलट फायदा होईल हे देखील यातून स्पष्ट झाले.

मला तुमच्याशी दीर्घ नातं तयार करायचं आहे. मी खोटं बोलणार नाही. नरेंद्र मोदी खोटं बोलतात पण मी खोटं बोलणार नाही, असे राहुल गांधींनी म्हटले. 
आम्ही 14 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर आणलं मात्र नरेंद्र मोदींनी कोट्यावधी लोकांना गरीब केल्याचा आरोपही त्यांनी पंतप्रधान मोदींवर लगावला आहे. या देशात 12 हजार रुपये महिना वेतन न मिळणारा एकही व्यक्ती नसेल असा आम्ही निर्णय घेतला आहे. अर्जुनाला जसा माशाचा डोळा दिसत होता, तसे मला हे उद्दीष्ट दिसत आहे. हे पैसे कसे देणार असा प्रश्न मला विचारला जात आहे. पण रामदेव बाबाला स्वस्तात जमीन देताना हा प्रश्न विचारला नाही. राफेलचं कंत्राट देताना हा प्रश्न विचारला नाही. आंबानीला पैसे देताना प्रश्न विचारला का? या सरकारने कर्जमाफी केली त्याचे पैसे आले का ? असे प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केले आहेत. 

राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशात 10 दिवसात कर्जमाफी करण्याचे आम्ही जाहीर केले होते ते आम्ही 10 दिवसाच्या आत केले. अनिल अंबानीवर 45 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. काही दिवसांपूर्वी ते जेलमध्ये जात होते, पण भावने पैसे भरून वाचवले.त्याने एकही विमान बनवले नाही. अशा व्यक्तीला राफेलचे मो"ठे कंत्राट कसे दिले ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर तुम्ही उद्योगपतीचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करू शकता मग शेतकर्‍यांचे का नाही ? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. 

राफेलमध्ये चौकीदाराने चोरी केली आहे. यातील दोषी असलेले कोणी वाचणार नाहीत निवडणुकीनंतर चौकीदाराची चौकशी होईल असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे.

भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 

- नागपूर आणि विदर्भाला पूर्ण जगाबरोबर जोडलं जाव़, विदर्भातील शेतकरी आपला माल लंडन, अमेरिका, जपान, चायनाच्या सुपर मार्केटमध्ये जावा
- मेड इन विदर्भ चीनमध्ये दिसावे असं माझं स्वप्न होतं
- मिहान प्रकल्प आम्ही आणला हब बनवण्यासाठी एकीकडे सिंगापूर दुसरीकडे विदर्भ
- पण मिहानची जमीन आंबनीला दिला, बाबा रामदेवला दिली
-भ्रष्टाचार, राष्ट्रीय, अर्थव्यवस्था, सुरक्षेवर माझ्याशी 15 मिनिट चर्चा करा
- 15 मिनिट माझ्यासमोर उभे रहा
- मी तुम्हाला सांगतो नरेंद्र मोदी तुम्हाला तोंड दाखवणार नाहीत
- त्यांना माहित आहे मला कुणी प्रश्न विचारले तर मी बोलू शकत नाही
- त्यामुळे ते कुठे ना कुठे लपतात
- मागील पाच वर्षात भ्रष्ट्राचार संपवण्यासाठी, रोजगार, शेतकरी यांच्यासाठी काय केले हे सागंयला हवे
- 45 वर्षात सगळ्यात जास्त लोक देशात बेरोजगार झाले आहेत
- 22 लाख सरकारी नोकर्‍या आम्ही 5 वर्षात भरणार
- नरेंद्र मोदींनी भरले
- 10 लाख युवकांना रोजगार आम्ही देऊ शकतो
- मेक इन इंडियाचे काय झाले- अंबानी, अदानी या पलिकडे काय आहे?
-देशात कुठलाही युवा उद्योग सुरू करू इच्छित असेल तर त्याला कोणतीही परवानगी घेण्याची गरज आम्ही ठेवणार नाही
- तुम्ही उद्योग सुरु करा, लोकांना रोजगार द्या मग तीन वर्षानंतर तुम्ही त्याबाबतची प्रक्रिया करा
 कमजोर लोकांची हत्या केली पाहिजे, खोटं बोललं पाहिजे असे गीतेत कुठेही म्हटलं नाही
- पण मोदी जिथे जातील तिथे विद्वेष पसरेल असं भाषण करतात