Corona : राज्यात आज तब्बल 74,045 जणांची कोरोनावर मात

कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढली.

Updated: Apr 23, 2021, 09:24 PM IST
Corona : राज्यात आज तब्बल 74,045 जणांची कोरोनावर मात title=

मुंबई : राज्यात आज 66,836 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तर तब्बल 74,045 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 34,04,792 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 81.81 टक्के झाला आहे.

गेल्या 24 तासात 773 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 41,88,266 व्यक्ती होमक्वारांटाईन आहेत तर 29378 व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईन आहेत. राज्यात सध्या 6,91,851 रुग्ण उपचार घेत आहेत.

मुंबईत सलग दुस-या दिवशी नविन कोरोना रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. आज मुंबईत 7221 नवे रूग्ण वाढले असून 9541 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत गेल्या 24 तासांत 71 जणांचा मृत्यू झाला आहे.

नागपुरात कोरोनाचे आज 7485 नवे रुग्ण वाढले आहेत. तर 82 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 6531 जणांनी कोरोनावर मात केली आहे.