महाराष्ट्रातील २ गिर्यारोहकांचा एव्हरेस्ट चढाईदरम्यान मृत्यू

एक तरुण आणि एका महिलेचा मृत्यू

Updated: May 24, 2019, 07:32 PM IST
महाराष्ट्रातील २ गिर्यारोहकांचा एव्हरेस्ट चढाईदरम्यान मृत्यू title=
अमित जोशी, मुंबई : अकलूजमधील निहाल बागवान या 27 वर्षीय तरुणाचा एव्हरेस्ट चढाई दरम्यान मृत्यू झाला आहे. तर मुंबईच्या अंजली कुलकर्णी या महिलेचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही महिला पतीसह एव्हरेस्ट चढाई मोहिमेत सहभागी झाली होती. कुलकर्णी दांपत्याचा मुलगा काठमांडूला रवाना झाला आहे.
 
एव्हरेस्टच्या 8400 मीटर वर असलेल्या ' बाल्कनी ' या ठिकाणी या गिर्यारोहकांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. 21-22 एव्हरेस्ट मोहिमेच्या चढाईसाठी वातावरण अनुकूल असल्याने एव्हरेस्टच्या शेवटच्या टप्प्यात एकाच वेळी सुमारे 250 पेक्षा जास्त गिर्यारोहक चढाई करत होते. शेर्पाचीही संख्या 100 च्या वर होती. एव्हरेस्टवर चढाई करतांना गर्दी झाल्याने अनेक गिर्यारोहकांना जास्त वेळ थांबावे लागले. तेव्हा जास्त वेळ गेल्यानं अतिउंचावरील त्रासाला सामोरं जावं लागल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.