'निवडणुकीत आम्हाला थर्ड अम्पायर मिळाला असता तर...', विधानसभेतील पराजयानंतर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे!

Raj Thackeray On Vidhansabha: आज मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रमात ते बोलले. रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी भाषण केलं. यावेळी मंचावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरदेखील उपस्थित होता.

प्रविण दाभोळकर | Updated: Dec 3, 2024, 09:31 PM IST
'निवडणुकीत आम्हाला थर्ड अम्पायर मिळाला असता तर...', विधानसभेतील पराजयानंतर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे!
राज ठाकरे

Raj Thackeray On Vidhansabha: विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. त्यामुळे मनसेचा एकही आमदार विधानसभेत दिसणार नाही. निवडणूक निकालानंतर अविश्वसनीय..तुर्तास एवढंच..अशी पोस्ट राज ठाकरेंनी केली होती. पण यानंतर राज ठाकरेंकडून काहीच प्रतिक्रिया आली नव्हती. मनसे नेत्यांच्या बैठकीत राज ठाकरेंनी सर्वांची मतं जाणून घेतली. यानंतर राज ठाकरे प्रतिक्रिया देतील अशी अपेक्षा साऱ्यांनाच होती. दरम्यान आज मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रमात ते बोलले. रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी भाषण केलं. यावेळी मंचावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरदेखील उपस्थित होता.

Add Zee News as a Preferred Source

काय म्हणाले राज ठाकरे?

शिक्षक नावाची गोष्ट राहिली नाही. दहावी, बारावीची मुलं येतात. काय करणार पुढे? असं मी विचारल्यावर मी डॉक्टर, इंजिनीअर होणार असे सांगतात. पण एकही विद्यार्थी मला शिक्षक व्हायचंय असं सांगतात. ज्या देशात विद्यार्थ्यांना शिक्षक व्हायचं नाही त्या देशाचं काय होणार? असे प्रश्नवजा चिंता राज ठाकरेंनी व्यक्त केली.

 गुरुपोर्णिमेला दरवर्षी आचरेकर सरांच्या पाया पडायला यायचे. पण आजकालची गुरुपोर्णिमा हॅप्पी गुरुपोर्णिमा मेसेजवर थांबते. गुरु नावाची गोष्ट जपणे हे महत्वाचे असते. सुनली रमणी यांच्याशी मी बोललो. इथे आचरेकर सरांचे स्मारक असावे असे मला वाटत होते. इथे मला पुतळा नको होता. इथे स्टम्प, बॅट, सर्व आहे. यावर आचरेकर सरांची कॅप आहे. कॅप त्यांची ओळख होती. आज क्रिकेट बदललंय. साऱ्या गोष्टी बदलल्यात. पण त्यांनी खेळाडूंवर केलेले संस्कार त्यांच्या समोर बसलेल्या खेळाडुंमध्ये दिसतात. आजही विद्यार्थी सांगतात आम्हाला तेंडुलकर, कांबळीसारखं खेळता येत नाही. आचरेकर सर जिनियस होते. 

तुमच्याकडे क्रिकेट बदलत गेल तस आमच्याकडेही (राजकारणात) सारं बदलंत गेलं. क्रिकेटमध्ये थर्ड अम्पायर असतो. त्यावेळी चुकीचा निर्णय बदलता येतो. निवडणूकीत आम्हाला थर्ड अम्पायर मिळाला असता तर अनेक निर्णय वेगळे दिसले असते पण आमच्याकडे असा थर्ड अम्पायर नसतोस असे राज ठाकरे म्हणाले. 

सुनिल रमणीने यासाठी मेहनत घेतली. अनधिकृत करायला गेल्यावर परवानगी लागत नाही. अधिकृत करायला गेल्यावर परवानग्या लागतात, असा टोला राज ठाकरे यांनी प्रशासनातील लाल फितीच्या कारभाराला उद्देशून लगावला.

3 डिसेंबरला सरांची जयंती असताना स्मारकाचे उद्घाटन करण्यास सचिन तेंडुलकर यांनी वेळ दिला आणि उपस्थित राहिले, असेही ते म्हणाले. 

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More