रश्मी वहिनींबद्दल राणे बोलले असं काही...

 तब्बल १२ वर्षांनंतर एका व्यासपीठावर आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री नारायण राणे यांनी आपल्यातील कटूता कमी केली आहे. 

Updated: Jun 23, 2017, 09:52 PM IST
रश्मी वहिनींबद्दल राणे बोलले असं काही... title=

दिनेश दुखंडे, झी मीडिया, कुडाळ :  तब्बल १२ वर्षांनंतर एका व्यासपीठावर आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री नारायण राणे यांनी आपल्यातील कटूता कमी केली आहे. 

दोघांनीही आपल्या भाषणात एकमेकांचा आदरार्थी उल्लेख केला. या कार्यक्रमानंतर नारायण राणे यांना झी २४ तासने प्रतिक्रिया विचारली असताा त्यांनी समाधान व्यक्त केले. 

रश्मी वहिनींबद्दल बोलले राणे... 

उद्धवजी आणि रश्मी वाहिनी यापूर्वीही कोकणात घरी आलेत. आज भूमीपूजनाचा कार्यक्रम सकाळी झाला असता तर सर्वांना घरी बोलवले असते. आणि मी आमंत्रण दिल्यावर कुणी नाही म्हणत नाही, अशा शब्दांत उद्धव आणि रश्मी ठाकरेंबद्दल आपल्या भावना राणे यांनी व्यक्त केल्या.