सरकारच्या मदतीवर धनंजय मुंडे यांचा खोचक टोला

हे सरकार गारा जपून ठेवणा-या गारपीट नुकसानग्रस्त शेतक-यांना अनुदानासाठी पात्र ठरवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा खोचक टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 14, 2018, 08:49 PM IST
सरकारच्या मदतीवर धनंजय मुंडे यांचा खोचक टोला title=

जालना : हे सरकार गारा जपून ठेवणा-या गारपीट नुकसानग्रस्त शेतक-यांना अनुदानासाठी पात्र ठरवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा खोचक टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. 

गारपीटग्रस्त शेतक-यांना कर्जमाफीसारखे किंवा बोंडअळीच्या अनुदानासारखे अती निकष लावू नका, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. जालना जिल्ह्यामधल्या मंठा तालुक्यातल्या गारपिठीनं नुकसान झालेल्या पिकाची त्यांनी पाहणी करुन शेतक-यांशी संवाद साधला. 

शेतक-यांच्या पंचनाम्याबाबत सरकारकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला. २४ तासाच्या मुदतीमध्ये सरकारनं पंचनामे केले नाहीत तर राष्ट्रवादीची ताकद दाखवून देऊ असा इशाराही त्यांनी यानिमित्तानं दिला.