औरंगाबादमध्ये RTI कार्यकर्त्याची आत्महत्या, चिठ्ठीत पोलिसांवर गंभीर आरोप

आरटीआय कार्यकर्त्याची गळफास घेऊन आत्महत्या

Updated: Feb 7, 2020, 11:50 AM IST
औरंगाबादमध्ये RTI कार्यकर्त्याची आत्महत्या, चिठ्ठीत पोलिसांवर गंभीर आरोप title=

औरंगाबाद : शहरातील जय भवानी नगरमध्ये एका आरटीआय कार्यकर्त्यानी आत्महत्या केली आहे. पंकज साहेबराव संकपळे असे आत्महत्या केलेल्या आरटीआय कार्यकर्त्यांचे नाव आहे. पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल करून जाणीवपूर्वक त्रास दिल्याने आत्महत्या करीत असल्याचं त्यानी चिठ्ठीत लिहलं आहे. 

पंकजने काल रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. टायपिंगचे काम करणारा पंकज आरटीआयचे ही काम करत होता. सर्वसामान्य लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी आरटीआयचा आधार घेतला होता. २०१७ मध्ये त्याच्यावर उस्मानपुरा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण आत्महत्येपूर्वी पंकजने त्याच्यावर पोलीस अधिकारी, कर्मचारी संबंधित संस्थेने खोटा गुन्हा दाखल करून त्याची बदनामी केल्याचा आरोप त्यांनी चिठ्ठीत केला आहे.