पोलिसांनी तयार केला सायबर बॉट; 'फसवणुकीचा मेसेज आल्यानंतर...'

Cyber bot AI:  भंडारा जिल्हा पोलीसांनी सायबर गुन्ह्यांना लगाम घालण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करायला सुरूवात केलीय. 

प्रविण दाभोळकर | Updated: Jan 10, 2025, 09:19 PM IST
पोलिसांनी तयार केला सायबर बॉट; 'फसवणुकीचा मेसेज आल्यानंतर...'
सायबर गुन्हे

Cyber bot AI: भंडारा जिल्हा पोलीसांनी सायबर गुन्ह्यांना लगाम घालण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करायला सुरूवात केलीय. सायबर फसवणूक झालेल्या व्यक्तीने व्हॉटसअपवर मॅसेज केल्यास AI उत्तरं देणाराय.. यामुळे सायबर क्राईम रोखण्यास मदत होणाराय. राज्यातील पहिला प्रयोग भंडाऱ्यातून सुरू झालाय.

Add Zee News as a Preferred Source

भंडा-यात सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी AIचा वापर केलाय. पोलिसांनी सायबर बॉट हा प्रोग्राम तयार केलाय. सायबर फसवणुकीची तक्रार असेल त्यांनी एक मेसेज करायचा आहे. मेसेज केल्यानंतर लगेच त्याच्यासमोर काही ऑप्शन दिले जातील. ते निवडल्यानंतर आपोआप सायबर हल्ला झालेल्या व्यक्तीला त्याच्या प्रश्नांची उत्तर मिळत जातील. 

आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी मदत होईल. हॅकर्स फेसबुक, व्हाट्सअप अकाउंट हॅक करतात. फसवणुकीचा मेसेज पाठवून बँकेतील पैसे काढून घेतात. या सर्व प्रकाराला आता आळा बसणारेय. राज्यातील हा पहिला प्रयोग भंडाऱ्यात राबवण्यात येतोय.. 

सायबर गुन्ह्यांची वाढती संख्या लक्षात घेता भंडारा पोलिसांनी सुरू केलेला AI बॉट हा उपक्रम अत्यंत महत्वाचा आणि उपयुक्त आहे.. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त याचा फायदा घ्यावा. आणि सायबर गुन्ह्यांपासून सावध राहावं असं आवाहन पोलिसांनी केलंय.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More