तिहेरी हत्येने सातारा हादरलं! महिलेची हत्या करुन दोन मुलांना विहिरीत ढकललं

तिहेरी हत्येने सातारा हादरलं! महिलेची हत्या करुन दोन मुलांना विहिरीत ढकललं

Updated: Jun 17, 2022, 04:25 PM IST
तिहेरी हत्येने सातारा हादरलं! महिलेची हत्या करुन दोन मुलांना विहिरीत ढकललं title=

सातारा : साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात वेलंग शिरंबे या गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. अनैतिक संबंधातून महिलेसह तिच्या दोन मुलांचा निर्घृण खून करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

योगिता नामदास नावाची महिला आपल्या दोन मुलांसह तिचा प्रियकर दत्ता नामदास याच्यासोबत राहत होती. काल या महिलेचा मृतदेह घरात संशयित अवस्थेत आढळून आला. पोलिसांना या घटनेचा तपास सुरू केल्यानंतर घराच्या बाजूलाच असलेल्या विहिरीत या महिलेच्या दोन्ही मुलांचे मुतदेह आढळून आले.या सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

हा तिहेरी हत्याकांडाचा प्रकार असल्याचं  समजताच रहिमतपूर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून योगिता नामदासचा प्रियकर दत्ता नामदास याला ताब्यात घेतलं. त्यानंतर हे हत्याकांड अनैतिक संबधातून झाल्याचे समोर आले.

आरोपी दत्ता नामदास याने पहिल्यांदा योगिता हीचा घरात गळा दाबून खून केला आणि त्या नंतर तिच्या दोन मुलांना विहिरी मध्ये ढकलून त्यांना देखील संपवलं. मृत योगिता हीची दोन्ही मुलं ही पहिल्या पतीपासून झाली होती. 

योगिताने आपल्या नवऱ्याला सोडलं होतं, आणि वेलंग शिरंबे या गावात दत्ता नामदास या प्रियकरा सोबत त्याचे नाव लावून राहत होती. या धक्कादायक हत्याकांडामुळे कोरेगाव तालुका आणि सातारा जिल्हा हादरून गेला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी दत्ता नामदास याला रहिमतपूर पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.