मतदारसंघामध्ये मतदार याद्यांमधील घोळ

मतदान हक्क बजावता न आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Updated: Aug 20, 2017, 03:23 PM IST
 मतदारसंघामध्ये मतदार याद्यांमधील घोळ  title=

ठाणे : मीरा भाईंदर निवडणुकीत अनेक मतदारसंघामध्ये मतदार याद्यांमधील घोळ समोर येत आहे. त्यामुळे कित्येकांना मतदान केंद्रावरून मत न देता परत यावं लागतंय. 

काही ठिकाणी अनेक वर्षापासून मतदान करणा-या लोकांची नावं मतदार यादीतून गायब झालीत. त्यामुळे अनेक उमेदवारांचे धाबे दणाणलेलत.

 महापालिका निवडणुकीच्या निकालावर याचा परिणाम होणार असल्याची भीती उमेदवारांना सतावत आहे. तर मतदान हक्क बजावता न आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.