Salman Khan-Aishwarya Rai: अंबानींच्या लग्नात सलमान-ऐश्वर्या आले एकत्र? व्हायरल फोटोमागील सत्य काय?

अनेक वर्षांनंतर अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकत्र आल्याची चर्चा होत आहे. अनंत-राधिका यांच्या लग्नातील एक फोटो व्हायरल झालाय. 

सोनेश्वर पाटील | Updated: Jul 28, 2024, 08:40 PM IST
Salman Khan-Aishwarya Rai: अंबानींच्या लग्नात सलमान-ऐश्वर्या आले एकत्र? व्हायरल फोटोमागील सत्य काय? title=

Salman Khan-Aishwarya Rai Viral Photo : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा 12 जुलै रोजी विवाहसोहळा पार पडला. बॉलिवूडपासून ते हॉलिवूड पर्यंतचे अनेक स्टार या शाही सोहळ्याला उपस्थित होते. यामध्ये बच्चन कुटुंब देखील होते. 

अनंत-राधिकाच्या विवाहसोहळ्याला अभिनेत्री ऐश्वर्या राय ही लेक आराध्या हिच्यासोबत आली होती. त्यामुळे बच्चन कुटुंब एकत्र आणि ऐश्वर्या राय आणि आराध्या वेगळं आल्याचं पाहून चाहत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर अनंत-राधिकाच्या विवाहसोहळ्यातील व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांना वेगळं पाहून सोशल मीडियावर पुन्हा एकदा त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. 

अनंतच्या लग्नात ऐश्वर्या लेकीसह

सलमान खानच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा ऐश्वर्या आणि सलमान खान यांची जोरदार चर्चा होत आहे. अभिषेक सोबत लग्न करण्यापूर्वी ऐश्वर्या ही सलमान खानच्या प्रेमात बुडाली होती. मात्र, हम दिल दे चुके सनमनंतर त्यांच्यामध्ये जोरदार भांडण झालं. त्यानंतर दोघांमधील वाद टोकाला गेला आणि ऐश्वर्याने सलमान सोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.  त्यानंतर ऐश्वर्याचं नाव अभिनेता विवेक ओबेरॉयसोबतही जोडलं गेलं. परंतु, जीवनसाथी म्हणून ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं. 

घटस्फोटाच्या चर्चा

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत आहेत. अशातच अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्यातही ऐश्वर्या संपूर्ण कुटुंबाला सोडून फक्त लेकीसोबतच आली होती. त्यामुळे पुन्हा एकदा घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

सलमान-ऐश्वर्या एकत्र? 

नुकताच सोशल मीडियावर अनंत अंबानीच्या लग्नातील सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यासोबत सलमानची लहान बहीण अर्पिता शर्मा एकत्र फोटोशूट असणारा फोटो व्हायरल होत आहे. मात्र, व्हायरल होणारा फोटो हा AI च्या मदतीने तयार करण्यात आला होता. या व्हायरल फोटोने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. त्यामुळे सलमान-ऐश्वर्या पुन्हा एकत्र आले की काय? अशी चर्चा होत होती.