अमिताभ बच्चन यांना माफी मागावी लागली, कारण...

वाहतूक कोंडीचा फटका महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांना सहन करावा लागला.  

Updated: Feb 6, 2019, 11:05 PM IST
अमिताभ बच्चन यांना माफी मागावी लागली, कारण... title=

मुंबई : वाहतूक कोंडीचा फटका महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांना सहन करावा लागला. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात 'दरवाजा बंद' कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ बिग बींच्या हस्ते झाला. हा कार्यक्रम दुपारी १२ वाजता सुरू होणं अपेक्षित होते. मात्र दुपारी १२.३० नंतर हा कार्यक्रम सुरू झाला. यावेळी उशिरा पोहोचल्याबद्द्ल आणि कार्यक्रमाला विलंब झाल्याबद्दल अमिताभ बच्चन यांनी उपस्थितांची माफी मागितली. 

या कार्यक्रमात स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी 'दरवाजा बंद' अभियानाची माहिती देताना बिग बींच्या नावाचा उल्लेख केला. त्यांच्या याच उल्लेखाचा धागा पकडत लोणीकर यांना टोला लगावला. 'दरवाजा बंद' योजनेपेक्षा लोणीकरांनी आपला जास्त उल्लेख केल्याबद्दल बिग बींनी या कार्यक्रमात दुसऱ्यांदा उपस्थितांची माफी मागितली. तसेच या अभियानाचे श्रेय थेट जमिनीवर काम करणाऱ्यांचे असून आपण फक्त चेहरा असल्याचं सांगायलाही अमिताभ विसरले नाहीत.