नवी मुंबईत मराठा आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांच्या 3 गाड्या पेटवल्या

नवी मुंबईत आंदोलनाला हिंसक वळण

Updated: Jul 25, 2018, 01:42 PM IST

नवी मुंबई : मराठा आंदोलनाला नवी मुंबईत हिंसक वळण लागलं आहे. कळंबोली येथे पोलिसांना मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला आहे. त्यानंतर आंदोलकांनी पोलिसांची गाडी पेटवली आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार देखील केला आहे. जमावाकडून पोलिसांवर दगडफेक देखील झाली आहे.  कळंबोली, मॅकडोनल्ड येथे सायन पनवेल महामार्गावर मुंबई आणि पुणेकडे जाणारी दोन्ही बाजुची वाहतूक बंद झाली आहे. आंदोलकांनी दोन्ही बाजुंची वाहतूक रोखून धरली आहे