मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल पाऊण तास उशिरानं

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत...

Updated: Dec 24, 2018, 08:44 PM IST
मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल पाऊण तास उशिरानं title=

मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल पाऊण तास उशिरानं धावत आहे. कल्याणच्या पुढे कर्जत, कसाऱ्याकडे जाणाऱ्या रेल्वेसेवेला मोठा फटका बसला आहे. चेन्नई एक्स्प्रेसचं इंजिन फेल झाल्याने मध्य रेल्वेवर खोळंबा झाला. यामुळे रेल्वे उशिराने धावत आहेत. 

मध्य रेल्वेचं विस्कळीत झालेलं वेळापत्रक अजूनही पूर्वपदावर येऊ शकलेलं नाही. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. आज आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने आणि कामावरुन सुटण्य़ाची वेळ असताना चाकरमान्यांची संख्या देखील यावेळी अधिक असते. त्यामुळे प्रवाशांना गर्दीचा देखील सामना करावा लागत आहे.