ऐन निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का

निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का

Updated: Oct 1, 2019, 12:27 PM IST
ऐन निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का title=
संग्रहित फोटो

मुंबई : निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे आमदारपद रद्द करावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.  याबाबत तपास करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलीय. 

मुख्यमंत्र्यांनी २०१४ मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना गुन्ह्यांची माहिती लपवून ठेवल्याची तक्रार याचिकेद्वारे करण्यात आली होती. आपल्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती फडणवीसांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दिली नव्हती अशी याचिकेत तक्रार करण्यात आली आहे. याबाबत तपास करण्यास सर्वोच्च न्यायालयानं हिरवा कंदील दिलाय. 

याच प्रकरणात उच्च न्यायालयाने रोख लावली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश स्थगित करत तपास करण्यास परवानगी दिली आहे.