'आंग्रीया सेल्फी'वरुन निरुपमांचा अमृता फडणवीसांना खास सल्ला

मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी या प्रकरणावरून अमृता यांना खास सल्ला दिलायं. 

Updated: Oct 22, 2018, 09:00 PM IST
'आंग्रीया सेल्फी'वरुन निरुपमांचा अमृता फडणवीसांना खास सल्ला  title=

मुंबई : आंग्रीया क्रूझवर गेलेल्या अमृता फडणवीसांना सेल्फी काढण्याचा मोह झाला आणि जहाजावर अगदी शेवटच्या टोकावर त्या जाऊन पोहोचल्या. खरतर तिथं जायला कोणालाच परवानगी नव्हती. त्यासाठी बॅरिगेट्सही लावण्यात आले आहेत पण मिसेस मुख्यमंत्र्यांना कुणी अडवलं नाही. त्यांच्याबरोबरच्या पोलीस अधिकाऱ्यांवर तर अगदी डोक्याला हात लावण्याची वेळ आली होती. अमृता फडणवीसांचा हा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यावर अमृता फडणवीसांवर प्रचंड टीका झाली. त्यानंतर सेल्फीसाठी नव्हे, तर वारा अनुभवण्यासाठी तिथे गेले होते, असं समर्थन अमृता फडणवीसांनी केलं आणि माफीही मागितली.

अमृता फडणवीस यांच्या या वागण्यावर विरोधकांनी सडकून टीका केलीय. मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी या प्रकरणावरून अमृता यांना खास सल्ला दिलायं.

निरुपमांचा सल्ला 

अमृता फडणवीस मुंबईत आल्यानंतर गाणं वैगेरे शिकल्या ही खूप चांगली गोष्ट आहे.

यासोबतच सुरक्षेचा प्रोटोकोलही त्यांनी शिकायला हवा', असा सल्ला संजय निरूपम यांनी दिलायं.

'वर्षा बंगल्याच्या बाहेर पडल्या तर त्यांना हवाच हवा मिळेल, यात कोणाला अडचण नाहीय पण जीव धोक्यात घालून हवा घेऊ नये' असंही ते म्हणाले.