मुंबई विद्यापीठाचा गोंधळात गोंधळ सुरुच

मुंबई विद्यापीठानं पदवीच्या निकालांबाबतचा घातलेला गोंधळ संपत नाही तोवर दुसरा गोंधळ घातलाय. 

Updated: Aug 21, 2017, 04:50 PM IST
मुंबई विद्यापीठाचा गोंधळात गोंधळ सुरुच title=

मुंबई : मुंबई विद्यापीठानं पदवीच्या निकालांबाबतचा घातलेला गोंधळ संपत नाही तोवर दुसरा गोंधळ घातलाय. 

मुंबई विद्यापीठाच्या पदवीचे निकाल अजून लागलेले नसताना एमएसस्सी संख्याशास्त्राच्या प्रवेशाची मुदत संपलीय. त्य़ामुळं विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होतोय. 

संख्याशास्त्राच्या मोजक्याच जागा असल्यामुळे बाहेरच्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. तर रूईया कॉलेजमध्ये एमएसस्सी मायक्रोबॉयलॉजीच्या प्रवेशाचीही मुदत संपलीय. विद्यार्थ्यांना मार्कशीटशिवाय प्रवेश मिळणार नसल्याचं कॉलेजनं स्पष्ट केलंय.